शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

साहेब, ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी मिळवून द्या ठेवीदारांचे उद्धव ठाकरे यांना साकडे : पाठपुरावा करण्याचे आश्वासन

By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST

जळगाव : साहेब, जिल्‘ातील हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या ठेवींपासून वंचित आहेत. त्यांना त्यांच्या ठेवी मिळवून द्या, अशा शब्दात जिल्‘ातील ठेवीदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडल्या. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

जळगाव : साहेब, जिल्‘ातील हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या ठेवींपासून वंचित आहेत. त्यांना त्यांच्या ठेवी मिळवून द्या, अशा शब्दात जिल्‘ातील ठेवीदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडल्या. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्र कोलमडल्यामुळे ठेवीदारांच्या हक्काची रक्कम परत करण्यास टाळाटाळ करणार्‍या संचालकांवर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा या आशयाचे निवेदन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना जनसंग्राम ठेवीदार संघटना व खान्देश ठेवीदार कृती समितीतर्फे अजिंठा विश्रामगृहावर देण्यात आले.

इन्फो-
ठेवीदारांची उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट
आमदारांची आढावा बैठक आटोपल्यानंतर जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे तसेच खान्देश कृती समितीचे प्रविणसिंग पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून निवेदन स्वीकारल्यानंतर विश्रामगृहासमोर बसलेल्या वयोवृद्ध ठेवीदांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे त्यांच्यापर्यंत आले व त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. गेल्या १० वर्षांपासून ठेवीदारांचा प्रश्न प्रलंबित असल्याची माहिती विवेक ठाकरे व इतर ठेवीदारांनी दिली. ठेवीच्या रकमा तत्काळ परत मिळण्याबाबत आपल्यास्तरावरून कारवाई व्हावी अशी विनंती ठेवीदारांनी केली. उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

काय आहेत ठेवीदारांच्या मागण्या
१) बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकांनी ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या रकमा परत मिळाव्या म्हणून संचालकांच्या मालमत्ता जप्त करून शासनाने नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकृत अधिकार्‍यांच्या समवेत तत्काळ केंद्रीय बैठकीचे आयोजन करावे.
२) जिल्ह्यातील इतर फसवणूक केलेल्या पतसंस्थाचालकांच्या विरोधात दाखल तक्रारींच्या अनुशंगाने एमपीआयडी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे.
३) जिल्ह्यातील शासनाच्या बिनव्याजी पॅकेजचा लाभ घेऊन मुदत संपल्यानंतर देखील शासनाचे पैसे परत न करणार्‍या संस्थांवर गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश करावे अशी विनंती करण्यात आली.
४) जिल्ह्यातील ५० हजारावरील ठेवीच्या रकमांना विमा संरक्षण देण्यात यावे.
५) ठेवीदारांच्या आयुष्यातील दुष्काळ संपविण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे.
६)जिल्ह्यातील तक्रार असलेल्या पतसंस्थांचे शासकीय लेखापरिक्षण करण्यात यावे तसेच उपवर मुलींच्या पॅकेजमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.