शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

साहेब, ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी मिळवून द्या ठेवीदारांचे उद्धव ठाकरे यांना साकडे : पाठपुरावा करण्याचे आश्वासन

By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST

जळगाव : साहेब, जिल्‘ातील हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या ठेवींपासून वंचित आहेत. त्यांना त्यांच्या ठेवी मिळवून द्या, अशा शब्दात जिल्‘ातील ठेवीदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडल्या. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

जळगाव : साहेब, जिल्‘ातील हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या ठेवींपासून वंचित आहेत. त्यांना त्यांच्या ठेवी मिळवून द्या, अशा शब्दात जिल्‘ातील ठेवीदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडल्या. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्र कोलमडल्यामुळे ठेवीदारांच्या हक्काची रक्कम परत करण्यास टाळाटाळ करणार्‍या संचालकांवर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा या आशयाचे निवेदन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना जनसंग्राम ठेवीदार संघटना व खान्देश ठेवीदार कृती समितीतर्फे अजिंठा विश्रामगृहावर देण्यात आले.

इन्फो-
ठेवीदारांची उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट
आमदारांची आढावा बैठक आटोपल्यानंतर जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे तसेच खान्देश कृती समितीचे प्रविणसिंग पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून निवेदन स्वीकारल्यानंतर विश्रामगृहासमोर बसलेल्या वयोवृद्ध ठेवीदांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे त्यांच्यापर्यंत आले व त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. गेल्या १० वर्षांपासून ठेवीदारांचा प्रश्न प्रलंबित असल्याची माहिती विवेक ठाकरे व इतर ठेवीदारांनी दिली. ठेवीच्या रकमा तत्काळ परत मिळण्याबाबत आपल्यास्तरावरून कारवाई व्हावी अशी विनंती ठेवीदारांनी केली. उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

काय आहेत ठेवीदारांच्या मागण्या
१) बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकांनी ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या रकमा परत मिळाव्या म्हणून संचालकांच्या मालमत्ता जप्त करून शासनाने नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकृत अधिकार्‍यांच्या समवेत तत्काळ केंद्रीय बैठकीचे आयोजन करावे.
२) जिल्ह्यातील इतर फसवणूक केलेल्या पतसंस्थाचालकांच्या विरोधात दाखल तक्रारींच्या अनुशंगाने एमपीआयडी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे.
३) जिल्ह्यातील शासनाच्या बिनव्याजी पॅकेजचा लाभ घेऊन मुदत संपल्यानंतर देखील शासनाचे पैसे परत न करणार्‍या संस्थांवर गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश करावे अशी विनंती करण्यात आली.
४) जिल्ह्यातील ५० हजारावरील ठेवीच्या रकमांना विमा संरक्षण देण्यात यावे.
५) ठेवीदारांच्या आयुष्यातील दुष्काळ संपविण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे.
६)जिल्ह्यातील तक्रार असलेल्या पतसंस्थांचे शासकीय लेखापरिक्षण करण्यात यावे तसेच उपवर मुलींच्या पॅकेजमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.