शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सागरला आता कोणत्याही क्षणी अटक

By admin | Updated: October 30, 2015 23:55 IST

जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाळूमाफिया सागर चौधरी याचा अटकपुर्व जामीन अर्ज शुक्रवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.कदम यांनी नांमजूर केला आहे. त्यामुळे सागरला आता कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. दरम्यान, न्यायालयातून तपासाची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शनिवारी ते सीआयडीच्या ताब्यात मिळण्याची शक्यता आहे.

जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाळूमाफिया सागर चौधरी याचा अटकपुर्व जामीन अर्ज शुक्रवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.कदम यांनी नांमजूर केला आहे. त्यामुळे सागरला आता कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. दरम्यान, न्यायालयातून तपासाची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शनिवारी ते सीआयडीच्या ताब्यात मिळण्याची शक्यता आहे.
रामानंद नगरचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आत्महत्या केली होती. आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते व वाळूमाफिया सागर चौधरी यांच्यापासून छळ होत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार त्यांच्या पत्नी माधुरी सादरे यांच्या फिर्यादीवरुन सुपेकर, रायते व सागर यांच्याविरुध्द नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

का फेटालला अटकपुर्व जामीन
वाळू चोरी प्रकरणात महसुल विभागाने केलेल्या कारवाईबाबत सरकारी वकीलांनी पुरावे दले
या पुराव्यामुळे सागर चौधरी वाळूमाफिया असल्याचे उघड
वरिष्ठांना हाताशी धरुन सागरने गुन्हे दाखल केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अहवाल
सागर व वरिष्ठांकडून मानसिक छळ होत असल्याचे सादरेंच्या नातेवाईकांनी दिलेले जबाब
वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे काम करीत नसल्याचा सादरेंचा छळ होत असल्याचा पोलिसांचा अहवाल
आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत व फिर्यादीत सागरचे नाव
सागरची पार्श्वभूमी पाहता साक्षीदार व फिर्यादीवर दबावाची शक्यता
वरिष्ठ अधिकारी व सागरच्या सहभागातील सत्य शोधण्यासाठी अटकेची आवश्यकता

कोट..
सागरच्या अटकपुर्व जामीन अर्जावरील सुनावणीसाठी तपासाची कागदपत्रे न्यायालयात सुपूर्द करण्यात आली होती. ही कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती शनिवारी आम्हाला मिळतील. या कागदपत्रांचा सुक्ष्म अभ्यास करुन त्यादृष्टीने तपास सुरु होईल.
-के.डी.पाटील, उपअधीक्षक (सीआयडी)

कोट..
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस संशयितांना अटक करु शकतात. या प्रकरणात सागरने अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर सरकार पक्षाने सागर हा वाळू माफिया असल्याचे तसेच वरिष्ठांच्या संगनमताने हा गुन्हा केल्याचा युक्तीवाद करुन पुरावे सादर केल्याने न्यायालयाने त्याचा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे पोलीस त्याला केव्हाही अटक करु शकतात.
-ॲड.राजेंद्र घुमरे, जिल्हा सरकारी वकील