शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

मोदी सरकारकडून भगवे आक्रमण- करात यांचा आरोप माकपची परिषद : हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

अलाप्पुझा : मोदी सरकार म्हणजे रा.स्व. संघ आणि भाजपचा संयुक्त उद्योग (जॉइंट एन्टरप्रायजेस) असून कॉपार्ेरेटस् आणि हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्यासाठी उजव्या संघटनांकडून आक्रमण केले जात असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला आहे.

अलाप्पुझा : मोदी सरकार म्हणजे रा.स्व. संघ आणि भाजपचा संयुक्त उद्योग (जॉइंट एन्टरप्रायजेस) असून कॉपार्ेरेटस् आणि हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्यासाठी उजव्या संघटनांकडून आक्रमण केले जात असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला आहे.
माकपच्या २१ व्या राज्य परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. मोदी सरकारने संसदेला बाजूला सारत अनेक विधेयकांवर वटहुकूम आणला आहे. अमेरिकेसोबत झालेल्या संरक्षण कराराचा आराखडा जनतेपासून दडवून ठेवण्यात आला आहे. अल्पसंख्यकांवरील हल्ले चिंताजनक असून संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत असहिष्णुतेला खतपाणी घातले जात आहे. (वृत्तसंस्था)
----------------------
सरकारच्या धोरणांवर संघाचा प्रभाव
सरकारच्या महत्त्वपूर्ण धोरणांवर रा.स्व. संघाचा प्रभाव दिसून येतो. हे सरकार म्हणजे भाजप आणि रा.स्व. संघाचा संयुक्त उद्योग आहे. या दोहोंमध्ये समन्वयासाठी समिती स्थापन झाल्याचे पाहता ही बाब अगदीच स्पष्ट झाली आहे. संघाकडून भाजपलाच नव्हे, तर सरकारलाही मार्गदर्शन केले जात आहे, असेही करात म्हणाले. मोदी सरकारची गेल्या नऊ महिन्यांतील कारकीर्द पाहता उजव्या संघटनांचे आक्रमण सुरू असल्याचे दिसून येते. उजव्या संघटनांचे हे आक्रमण दोन महत्त्वाच्या घटकांसाठी आहे. कॉपार्ेरेट जगतातील बडे उद्योगसमूह आणि दुसरे रा.स्व. संघाच्या नेतृत्वातील हिंदुत्वासाठी. कॉपार्ेरेट क्षेत्राकडून मुक्त धोरणांचा रेटा आक्रमकपणे लावला जात आहे. रा.स्व. संघाकडून जातीयवादाचा अजेंडा राबविला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.