शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

बेचव रस्समवरून लग्न मोडलं, पण अखेर दुस-याशी लागलं

By admin | Updated: February 1, 2016 14:05 IST

रिसेप्शनच्या जेवणामधलं रस्सम बेचव होतं, म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची आणि नंतर एका लांबच्या नातेवाईकाने लग्न करत शेवट गोड केल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
टूमकूर ( कर्नाटक), दि. १ - रिसेप्शनच्या जेवणामधलं रस्सम बेचव होतं, म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची आणि नंतर एका लांबच्या नातेवाईकाने लग्न करत शेवट गोड केल्याची घटना घडली आहे. 
एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी असा हा सीन असला तरी ती सत्यकथा आहे. टुमकूरमधल्या कुमीगल येथे हा प्रकार रविवारी घडला आहे. लग्नाच्या आदल्या रात्री रिसेप्शन ठेवण्यात होतं आणि जवळपास ३०० पाहुणेही आले होते.
एकीकडे वधु आणि वर विधींमध्ये व्यस्त होते आणि दुसरीकडे भोजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी वराच्या वडिलांनी जेवणामधल्या रस्समची चव खराब असल्याचा आरडाओरडा केला आणि मुलीच्या घरच्यांशी वाद घातला. हा प्रकार घडल्यानंतर विधी सोडून नवरदेव आला आणि तोही वडिलांच्या बाजुने बोलायला लागला. अखेर, बंगळूरचा असलेला नवरदेव आणि त्याचे कुटुंब चक्क सभामंडप सोडून निघून गेले.
मुलगा व मुलीने स्वखुशीने एकमेकांना निवडलेले असताना असा प्रकार का घडावा असा प्रश्न वधुपित्यांना पडला. अत्यंत विचित्र अवस्थेत सापडलेल्या वधुपित्याने मुलीशी लग्न करायला कुणी इच्छुक आहे का याची विचारणा केली आणि एक दूर दूरचा नातेवाईक त्यांच्या सहाय्यास आला आणि त्याने लग्नास सहमती दर्शवली.
त्यामुळे रस्समच्या चवी वरून एकाशी मोडलेले लग्न दुस-याशी लागले आणि शेवट गोड झाला.