शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बेचव रस्समवरून लग्न मोडलं, पण अखेर दुस-याशी लागलं

By admin | Updated: February 1, 2016 14:05 IST

रिसेप्शनच्या जेवणामधलं रस्सम बेचव होतं, म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची आणि नंतर एका लांबच्या नातेवाईकाने लग्न करत शेवट गोड केल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
टूमकूर ( कर्नाटक), दि. १ - रिसेप्शनच्या जेवणामधलं रस्सम बेचव होतं, म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची आणि नंतर एका लांबच्या नातेवाईकाने लग्न करत शेवट गोड केल्याची घटना घडली आहे. 
एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी असा हा सीन असला तरी ती सत्यकथा आहे. टुमकूरमधल्या कुमीगल येथे हा प्रकार रविवारी घडला आहे. लग्नाच्या आदल्या रात्री रिसेप्शन ठेवण्यात होतं आणि जवळपास ३०० पाहुणेही आले होते.
एकीकडे वधु आणि वर विधींमध्ये व्यस्त होते आणि दुसरीकडे भोजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी वराच्या वडिलांनी जेवणामधल्या रस्समची चव खराब असल्याचा आरडाओरडा केला आणि मुलीच्या घरच्यांशी वाद घातला. हा प्रकार घडल्यानंतर विधी सोडून नवरदेव आला आणि तोही वडिलांच्या बाजुने बोलायला लागला. अखेर, बंगळूरचा असलेला नवरदेव आणि त्याचे कुटुंब चक्क सभामंडप सोडून निघून गेले.
मुलगा व मुलीने स्वखुशीने एकमेकांना निवडलेले असताना असा प्रकार का घडावा असा प्रश्न वधुपित्यांना पडला. अत्यंत विचित्र अवस्थेत सापडलेल्या वधुपित्याने मुलीशी लग्न करायला कुणी इच्छुक आहे का याची विचारणा केली आणि एक दूर दूरचा नातेवाईक त्यांच्या सहाय्यास आला आणि त्याने लग्नास सहमती दर्शवली.
त्यामुळे रस्समच्या चवी वरून एकाशी मोडलेले लग्न दुस-याशी लागले आणि शेवट गोड झाला.