शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

बेचव रस्समवरून लग्न मोडलं, पण अखेर दुस-याशी लागलं

By admin | Updated: February 1, 2016 14:05 IST

रिसेप्शनच्या जेवणामधलं रस्सम बेचव होतं, म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची आणि नंतर एका लांबच्या नातेवाईकाने लग्न करत शेवट गोड केल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
टूमकूर ( कर्नाटक), दि. १ - रिसेप्शनच्या जेवणामधलं रस्सम बेचव होतं, म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची आणि नंतर एका लांबच्या नातेवाईकाने लग्न करत शेवट गोड केल्याची घटना घडली आहे. 
एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी असा हा सीन असला तरी ती सत्यकथा आहे. टुमकूरमधल्या कुमीगल येथे हा प्रकार रविवारी घडला आहे. लग्नाच्या आदल्या रात्री रिसेप्शन ठेवण्यात होतं आणि जवळपास ३०० पाहुणेही आले होते.
एकीकडे वधु आणि वर विधींमध्ये व्यस्त होते आणि दुसरीकडे भोजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी वराच्या वडिलांनी जेवणामधल्या रस्समची चव खराब असल्याचा आरडाओरडा केला आणि मुलीच्या घरच्यांशी वाद घातला. हा प्रकार घडल्यानंतर विधी सोडून नवरदेव आला आणि तोही वडिलांच्या बाजुने बोलायला लागला. अखेर, बंगळूरचा असलेला नवरदेव आणि त्याचे कुटुंब चक्क सभामंडप सोडून निघून गेले.
मुलगा व मुलीने स्वखुशीने एकमेकांना निवडलेले असताना असा प्रकार का घडावा असा प्रश्न वधुपित्यांना पडला. अत्यंत विचित्र अवस्थेत सापडलेल्या वधुपित्याने मुलीशी लग्न करायला कुणी इच्छुक आहे का याची विचारणा केली आणि एक दूर दूरचा नातेवाईक त्यांच्या सहाय्यास आला आणि त्याने लग्नास सहमती दर्शवली.
त्यामुळे रस्समच्या चवी वरून एकाशी मोडलेले लग्न दुस-याशी लागले आणि शेवट गोड झाला.