शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

विरंगुळ्याच्या क्षणी जंगमांच्या तोंडून शिवकथा श्रवण करताना निरंजनीचे साधू-महंत

By admin | Updated: September 10, 2015 16:46 IST

त्र्यंबकेश्वर : ना शाहीस्नान मिरवणूक, ना कोणते धार्मिक कार्य. अशा निवांत विरंगुळ्याच्या क्षणी त्र्यंबकेश्वर येथे जंगम समाजाचे लोक साधू-महंतांना शिवकथा ऐकवित आहेत. विशेष म्हणजे, खूश होऊन साधू-महात्मा शंभरपासून पाचशे रुपयांपर्यंत दक्षिणा देत असतानाचे दृश्य पाहावयास मिळत आहे.

त्र्यंबकेश्वर : ना शाहीस्नान मिरवणूक, ना कोणते धार्मिक कार्य. अशा निवांत विरंगुळ्याच्या क्षणी त्र्यंबकेश्वर येथे जंगम समाजाचे लोक साधू-महंतांना शिवकथा ऐकवित आहेत. विशेष म्हणजे, खूश होऊन साधू-महात्मा शंभरपासून पाचशे रुपयांपर्यंत दक्षिणा देत असतानाचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
सध्या त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थविषयक वातावरण आहे. जिकडे पाहावे तिकडे सत्संग व नामांकित प्रवचनकारांची प्रवचने सुरू आहेत. भंडारा-भोजनाची रेलचेल सुरू आहे. अशा वेळी जंगम लोक शिवकथा सांगून आखाड्यांकडून मिळेल ती बिदागी व भोजनाचा लाभ घेत असतात. हे जंगम त्र्यंबकमधील दहा आखाडे, मठ, आश्रम, साधुग्राम आदि ठिकाणी दिवसभर भटकत असतात. यासंदर्भात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरीजी महाराज यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांची म्हणायची ढब, म्हणताना होणारे हावभाव पाहण्यासारखे असतात. शिवपार्वती विवाहसमयी दान कोणीच घेईना. अशा वेळी भगवान शंकराला मोठा पेच पडला. दान तर दिलेच पाहिजे. शेवटी भगवान शंकराने आपल्या जांधेवर (मांडीवर) फटका मारला आणि या जंगमांची उत्पत्ती होऊन त्यांनी दान घेतले आणि तेव्हापासून जंगम शिवकथा ऐकवून दान मागतात. विशेष म्हणजे, हे लोक संन्यासींकडूनच दान घेत असतात. हे लोक प्रापंचिक असतात. डोक्यावर विशिष्ट आकाराचा फेटा बांधून दोन्ही कानांवर व डोक्यावर झांजा बसविलेल्या असतात. डोक्याच्या मध्यभागावर एक मोठा तुरा असतो आणि हा तुरा म्हणजे या समाजाची ओळख असते. गीतातून सांगितलेल्या त्यांच्या कथा साधू-महंतांना डोलायला लावतात. (वार्ताहर)
---