शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

Save Soil Movement : माती नसती तर मानवाचे अस्तित्वही नसते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 06:30 IST

Save Soil Movement : आज आम्ही ज्या मातीला पाहत आहोत तिच्या निर्मितीसाठी निसर्गाला लाखो वर्षे लागली. भूकंप, ज्वालामुखी स्फोट आणि अन्य नैसर्गिक घटनांनी खडकाचे तुकडे केले.

आपण कधी याचा विचार केला आहे की, सद्गुरू ज्या मातीला वाचविण्याचे आवाहन करत आहेत आणि लोकमत वृत्तपत्रसमूह ज्या ‘सेव्ह सॉइल’ मोहिमेला बळ देत आहे, ती माती कशी बनली? आम्हाला याची कल्पना आहे की, माती नसती तर या पृथ्वीवर बहुधा मनुष्याचे अस्तित्व राहिले नसते. दुर्दैवी बाब अशी आहे की, मातीची झीज वेगाने होत आहे. मात्र, या मातीबाबत चर्चा करण्याआधी हे जाणून घ्या की, माती बनली कशी?

आज आम्ही ज्या मातीला पाहत आहोत तिच्या निर्मितीसाठी निसर्गाला लाखो वर्षे लागली. भूकंप, ज्वालामुखी स्फोट आणि अन्य नैसर्गिक घटनांनी खडकाचे तुकडे केले. मातीच्या निर्मितीची ही पहिली प्रक्रिया होती. त्यानंतर पाऊस, वेगाने वाहणारे पाणी, हवा आणि हिमनदीने या खडकांचे बारीक तुकडे करणे सुरू केले. या बारीक तुकड्यांसोबत ओलसरपणा आणि हवेमुळे रासायनिक प्रक्रिया सुरू झाली आणि अशाप्रकारे मातीचे अस्तित्व समोर आले.  यात कवक आणि शेवाळ यांनी प्रमुख भूमिका पार पाडली. ज्यामुळे मातीमध्ये जीवनशक्तीचा संचार झाला. नव्या जिवांनी जन्म घेतला आणि वनस्पती उगवणे सुरू झाले. 

आपल्याला ही माहिती घेऊन आनंद होईल की, निसर्गाने मातीची निर्मिती बंद केलेली नाही. तर ही एक सातत्याने मात्र संथ होणारी प्रक्रिया आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर माती ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असंघटित पदार्थांचा वरचा थर आहे. खडक आणि वनस्पतींच्या एकत्रीकरणातून ती बनली आहे. 

परिस्थिती आणि काळानुसार मातीचे अनेक प्रकार आहेत. भारताबद्दलच बोलायचे झाले तर उत्तर सपाट भागात गाळाची माती आढळते. कृषी उत्पादनात या मातीचे महत्त्वाचे योगदान आहे. ही माती हलक्या तपकिरी रंगाची असते. या भागात दरवर्षी पूर येतो आणि अनेक ठिकाणी नवी माती पसरली जाते. या मातीमध्ये ओलसरपणा शोषून घेण्याची शक्ती असते. यात पोटॅश, फॉस्फरस, चुना आणि कार्बनिक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. 

काळी माती ही ज्वालामुखीमुळे तयार होते. यात लोह, मॅग्नेशियम, चुना, ॲल्युमिनियम आणि कार्बनिक पदार्थ अधिक प्रमाणात असतात. पाऊस पडल्यानंतर ही माती चिकट होते आणि कोरडी झाल्यानंतर मोकळी होते. त्यामुळे ऑक्सिजन खोलपर्यंत प्रवेश करतो. ही माती गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि उत्तर कर्नाटकात अधिक प्रमाणात दिसून येते. याशिवाय लाल, पिवळी माती कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागात, तामिळनाडू, मेघालय, ओडिशा, प. बंगालमध्ये आढळून येते. यात लोह अधिक प्रमाणात असते. ही ग्रेनाइटसारख्या प्राचीन खडकांपासून तुटून बनते. ही कमी उत्पादकतेची माती समजली जाते. ज्या भागात २०० सेंमीपेक्षा अधिक पाऊस होतो, तिथे लाल माती आढळून येते. याशिवाय अनेक प्रकारची माती आढळून येते जी जीवनाचा आधार आहे. 

टॅग्स :Lokmatलोकमत