शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
3
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
4
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
5
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
6
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
7
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
8
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
9
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
10
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
11
Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
12
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
13
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार
14
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
15
IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
16
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
17
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
18
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
19
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका

Save Soil Movement : माती नसती तर मानवाचे अस्तित्वही नसते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 06:30 IST

Save Soil Movement : आज आम्ही ज्या मातीला पाहत आहोत तिच्या निर्मितीसाठी निसर्गाला लाखो वर्षे लागली. भूकंप, ज्वालामुखी स्फोट आणि अन्य नैसर्गिक घटनांनी खडकाचे तुकडे केले.

आपण कधी याचा विचार केला आहे की, सद्गुरू ज्या मातीला वाचविण्याचे आवाहन करत आहेत आणि लोकमत वृत्तपत्रसमूह ज्या ‘सेव्ह सॉइल’ मोहिमेला बळ देत आहे, ती माती कशी बनली? आम्हाला याची कल्पना आहे की, माती नसती तर या पृथ्वीवर बहुधा मनुष्याचे अस्तित्व राहिले नसते. दुर्दैवी बाब अशी आहे की, मातीची झीज वेगाने होत आहे. मात्र, या मातीबाबत चर्चा करण्याआधी हे जाणून घ्या की, माती बनली कशी?

आज आम्ही ज्या मातीला पाहत आहोत तिच्या निर्मितीसाठी निसर्गाला लाखो वर्षे लागली. भूकंप, ज्वालामुखी स्फोट आणि अन्य नैसर्गिक घटनांनी खडकाचे तुकडे केले. मातीच्या निर्मितीची ही पहिली प्रक्रिया होती. त्यानंतर पाऊस, वेगाने वाहणारे पाणी, हवा आणि हिमनदीने या खडकांचे बारीक तुकडे करणे सुरू केले. या बारीक तुकड्यांसोबत ओलसरपणा आणि हवेमुळे रासायनिक प्रक्रिया सुरू झाली आणि अशाप्रकारे मातीचे अस्तित्व समोर आले.  यात कवक आणि शेवाळ यांनी प्रमुख भूमिका पार पाडली. ज्यामुळे मातीमध्ये जीवनशक्तीचा संचार झाला. नव्या जिवांनी जन्म घेतला आणि वनस्पती उगवणे सुरू झाले. 

आपल्याला ही माहिती घेऊन आनंद होईल की, निसर्गाने मातीची निर्मिती बंद केलेली नाही. तर ही एक सातत्याने मात्र संथ होणारी प्रक्रिया आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर माती ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असंघटित पदार्थांचा वरचा थर आहे. खडक आणि वनस्पतींच्या एकत्रीकरणातून ती बनली आहे. 

परिस्थिती आणि काळानुसार मातीचे अनेक प्रकार आहेत. भारताबद्दलच बोलायचे झाले तर उत्तर सपाट भागात गाळाची माती आढळते. कृषी उत्पादनात या मातीचे महत्त्वाचे योगदान आहे. ही माती हलक्या तपकिरी रंगाची असते. या भागात दरवर्षी पूर येतो आणि अनेक ठिकाणी नवी माती पसरली जाते. या मातीमध्ये ओलसरपणा शोषून घेण्याची शक्ती असते. यात पोटॅश, फॉस्फरस, चुना आणि कार्बनिक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. 

काळी माती ही ज्वालामुखीमुळे तयार होते. यात लोह, मॅग्नेशियम, चुना, ॲल्युमिनियम आणि कार्बनिक पदार्थ अधिक प्रमाणात असतात. पाऊस पडल्यानंतर ही माती चिकट होते आणि कोरडी झाल्यानंतर मोकळी होते. त्यामुळे ऑक्सिजन खोलपर्यंत प्रवेश करतो. ही माती गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि उत्तर कर्नाटकात अधिक प्रमाणात दिसून येते. याशिवाय लाल, पिवळी माती कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागात, तामिळनाडू, मेघालय, ओडिशा, प. बंगालमध्ये आढळून येते. यात लोह अधिक प्रमाणात असते. ही ग्रेनाइटसारख्या प्राचीन खडकांपासून तुटून बनते. ही कमी उत्पादकतेची माती समजली जाते. ज्या भागात २०० सेंमीपेक्षा अधिक पाऊस होतो, तिथे लाल माती आढळून येते. याशिवाय अनेक प्रकारची माती आढळून येते जी जीवनाचा आधार आहे. 

टॅग्स :Lokmatलोकमत