शहरं
Join us  
Trending Stories
1
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
2
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
3
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
4
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
5
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
6
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...
7
Astro Tips: चमचाभर तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा, मंगळवारी पिंपळाच्या पारावर ठेवायला हवा; कारण...
8
Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
9
अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश
10
"मी २५ वर्षं आमदार, १० वर्ष लोकसभेचा खासदार...!"; छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
11
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
12
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
13
Shravan Special Recipe: श्रावणात नैवेद्याच्या ताटाची लज्जत वाढवेल 'हा' कोबीचा चटका; कमी साहित्यात चविष्ट रेसेपी 
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
15
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
16
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
17
घरात वीज, शौचालय नाही, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास...; भारताच्या लेकीचं जपानमध्ये कौतुक
18
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
19
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
20
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला

शिवसेनेनंतर अकाली दलावर संकट

By admin | Updated: October 16, 2014 05:02 IST

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका आटोपताच भाजपाशी युती कायम ठेवण्याबाबत शिवसेनेनंतर आता शिरोमणी अकाली दलही फेरविचार करण्याची शक्यता आहे

हरीश गुप्ता, नवी दिल्लीमहाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका आटोपताच भाजपाशी युती कायम ठेवण्याबाबत शिवसेनेनंतर आता शिरोमणी अकाली दलही फेरविचार करण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात कटूता निर्माण झाल्यापासूनच अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांचे मोदी सरकारमध्ये कायम राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु अवजड उद्योगमंत्री अनंत गीते आणि हरसिमरत कौर यांच्यात तुलना करता येणार नाही. शिवसेना महाराष्ट्रात भाजपाविरुद्ध निवडणूक लढत असतानाही गीते मोदी सरकारमध्ये कायम आहेत. १९ आॅक्टोबरला निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लोकसभेतील शिवसेनेचे १८ खासदार आपला पुढचा कृती कार्यक्रम ठरविणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणात आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली असताना विधानसभा निवडणुकीत शिअदने भाजपाला विरोध करण्याचे काहीही कारण नव्हते. शिअद मोदींच्या +४५ मिशनचे समर्थन करेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रकाशसिंग बादल यांचे चौटाला कुटुंबीयांसमवेत ६० वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत, असे सांगत शिअदने भारतीय राष्ट्रीय लोकदलाशी (भारालोद)आघाडी केली. शिअदने लोकसभा निवडणुकीत भारालोदला पाठिंबा दिलेला नव्हता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या पक्षाशी आघाडी करण्याचे कारण नव्हते, असे स्पष्ट करून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र शिअदचा हा युक्तिवाद अमान्य केला होता.अमृतसर लोकसभा मतदारसंघामध्ये अरुण जेटली यांचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भाजपा शिअदवर कमालीचा नाराज झाला होता. नवज्योतसिंग सिद्धू यांना बाजूला सारण्यासाठीच शिअदने जेटली यांना अमृतसरमधून लढण्याचे निमंत्रण दिले होते आणि तेथे जेटली पराभूत झाल्याने भाजप उद्विग्न होणे स्वाभाविक आहे. आता भाजपाने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सिद्धूंना उतरविल्यानंतर पंजाबमध्येही त्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे संकेत दिले आहेत.वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पंजाबला जादा नित्तीय साहाय्य देण्यास नकार दिला त्याचवेळी भाजपाची ही शिअदविरोधी भूमिका स्पष्ट झाली होती. संपुआ सरकारच्या काळात पंजाबला आवश्यकतेपेक्षा जास्त वित्तीय साहाय्य देण्यात आल्याने आता पंजाबने अधिक साहाय्य मिळण्याची अपेक्षा बाळगू नये, असे जेटली यांनी अकालींना स्पष्टपणे सांगितले होते.