शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रशिया केव्हाही भारताच्या मदतीला ५ युद्धनौका, विमाने, ३००० सैनिक पाठवू शकणार; महत्वाच्या कराराची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 20:33 IST

भारताने जेव्हा बांग्लादेशला स्वातंत्र्य देण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्ध छेडले तेव्हा अमेरिका त्यांच्या युद्धनौका घेऊन भारतावर चाल करून येत होता. रशियाला समजताच त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या युद्धनौका अमेरिकन नौदलाच्या मागावर पाठवून दिल्या होत्या.

रशिया - युक्रेन युद्ध सुरु असताना रशियावर युद्ध थांबविण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा, विरोधात भुमिका मांड्याव्यात म्हणून अमेरिका, युरोपसह जगभरातून प्रचंड दबाव टाकला जात होता. तरीही भारताने रशियाविरोधात भुमिका घेतली नाही. कारण जेव्हा अमेरिका, युरोप भारताविरोधात उभा ठाकलेला तेव्हा एकटा रशियाच होता ज्याने भारताला साथ दिली होती. आज जगात भारत आणि रशियाची मैत्री प्रसिद्ध आहे. या मैत्रीतून नव्या संरक्षण करारांकडे पाऊल टाकले जात आहे.

 भारताने जेव्हा बांग्लादेशला स्वातंत्र्य देण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्ध छेडले तेव्हा अमेरिका त्यांच्या युद्धनौका घेऊन भारतावर चाल करून येत होता. रशियाला समजताच त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या युद्धनौका अमेरिकेच्या मागावर पाठवून दिल्या होत्या. यापूर्वी आणि यांनतरही रशिया भारताच्या वेळोवेळी मदतीला धावून आला आहे. असे असताना दोन्ही देशांमध्ये एक महत्वाचा करार होऊ घातला आहे. दोन्ही देश एकमेकांच्या देशात आपले सैन्य तैनात करू शकतील अशा कराराची चर्चा करण्याचे आदेश रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्टिन यांनी रशियन संरक्षण मंत्रालयाला दिले आहेत. स्पुतनिक इंडियाने याचे वृत्त दिले आहे. 

रशिया आणि भारतातील हा नवा संरक्षण करार युरोप आणि आशियाई सुरक्षेला आणखी मजबूत करणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लष्करी तैनाती करार संयुक्त सरावांमध्ये सहभागी होणाऱ्या रशियन आणि भारतीय लष्करी तुकड्यांसाठी प्रक्रिया सुलभ करणारा ठरणार आहे. दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील तैनाती आणि रसद पुरविणे सोपे जाणार आहे. 

संयुक्त सराव आणि प्रशिक्षण, मानवतावादी मदत आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सैन्य पाठवण्याची तरतूद या करारात करण्यात येणार आहे. पाचपेक्षा जास्त युद्धनौका, 10 विमाने आणि तीन हजार सैन्य हे दोन्ही देश एकमेकांच्या मदतीसाठी पाठवू शकणार आहेत. ही मर्यादा हे देश त्यांच्या गरजेनुसार वाढवूही शकणार आहेत. यामुळे हवाई, समुद्री आणि जमिनीवरील दोन्ही देशांची ताकद वाढणार आहे. 

टॅग्स :russiaरशियाIndian Armyभारतीय जवान