शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

रशिया केव्हाही भारताच्या मदतीला ५ युद्धनौका, विमाने, ३००० सैनिक पाठवू शकणार; महत्वाच्या कराराची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 20:33 IST

भारताने जेव्हा बांग्लादेशला स्वातंत्र्य देण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्ध छेडले तेव्हा अमेरिका त्यांच्या युद्धनौका घेऊन भारतावर चाल करून येत होता. रशियाला समजताच त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या युद्धनौका अमेरिकन नौदलाच्या मागावर पाठवून दिल्या होत्या.

रशिया - युक्रेन युद्ध सुरु असताना रशियावर युद्ध थांबविण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा, विरोधात भुमिका मांड्याव्यात म्हणून अमेरिका, युरोपसह जगभरातून प्रचंड दबाव टाकला जात होता. तरीही भारताने रशियाविरोधात भुमिका घेतली नाही. कारण जेव्हा अमेरिका, युरोप भारताविरोधात उभा ठाकलेला तेव्हा एकटा रशियाच होता ज्याने भारताला साथ दिली होती. आज जगात भारत आणि रशियाची मैत्री प्रसिद्ध आहे. या मैत्रीतून नव्या संरक्षण करारांकडे पाऊल टाकले जात आहे.

 भारताने जेव्हा बांग्लादेशला स्वातंत्र्य देण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्ध छेडले तेव्हा अमेरिका त्यांच्या युद्धनौका घेऊन भारतावर चाल करून येत होता. रशियाला समजताच त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या युद्धनौका अमेरिकेच्या मागावर पाठवून दिल्या होत्या. यापूर्वी आणि यांनतरही रशिया भारताच्या वेळोवेळी मदतीला धावून आला आहे. असे असताना दोन्ही देशांमध्ये एक महत्वाचा करार होऊ घातला आहे. दोन्ही देश एकमेकांच्या देशात आपले सैन्य तैनात करू शकतील अशा कराराची चर्चा करण्याचे आदेश रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्टिन यांनी रशियन संरक्षण मंत्रालयाला दिले आहेत. स्पुतनिक इंडियाने याचे वृत्त दिले आहे. 

रशिया आणि भारतातील हा नवा संरक्षण करार युरोप आणि आशियाई सुरक्षेला आणखी मजबूत करणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लष्करी तैनाती करार संयुक्त सरावांमध्ये सहभागी होणाऱ्या रशियन आणि भारतीय लष्करी तुकड्यांसाठी प्रक्रिया सुलभ करणारा ठरणार आहे. दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील तैनाती आणि रसद पुरविणे सोपे जाणार आहे. 

संयुक्त सराव आणि प्रशिक्षण, मानवतावादी मदत आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सैन्य पाठवण्याची तरतूद या करारात करण्यात येणार आहे. पाचपेक्षा जास्त युद्धनौका, 10 विमाने आणि तीन हजार सैन्य हे दोन्ही देश एकमेकांच्या मदतीसाठी पाठवू शकणार आहेत. ही मर्यादा हे देश त्यांच्या गरजेनुसार वाढवूही शकणार आहेत. यामुळे हवाई, समुद्री आणि जमिनीवरील दोन्ही देशांची ताकद वाढणार आहे. 

टॅग्स :russiaरशियाIndian Armyभारतीय जवान