शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकचे तांदूळ बाजारात विकले जात असल्याची अफवा

By admin | Updated: June 7, 2017 12:25 IST

प्लॅस्टिकचे तांदूळ काही किराणा मालाच्या दुकानात विकायला आल्याची अफवा मंगळवारी तेलंगणा आणि आंध्रप्रदेश भागात पसरली होती.

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 7- प्लॅस्टिकचे तांदूळ काही किराणा मालाच्या दुकानात विकायला  आल्याची अफवा मंगळवारी तेलंगणा आणि आंध्रप्रदेश भागात पसरली होती. हैदराबादच्या सरूरनगरमधील एका बिर्याणी पॉईंटवर प्लॅस्टिकच्या तांदळापासून तयार केलेली बिर्याणी विकण्यात आली होती. त्याचवेळी मीरपेत भागातही तसाच प्रकार घडला होता. तेथील किराणा मालाच्या दुकानातून तांदूळ खरेदी करताना एका व्यक्तीला प्लॅस्टिकचा तांदूळ देण्यात आला. या दोन घटनांनंतर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ विकला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने मीरपेतमधील दुकानावर छापे टाकून तेथील तांदळाचे काही नमुने जप्त केले आहेत. या नमुन्यांची सध्या तपासणी होते आहे. दरम्यान, प्लॅस्टिकचा तांदूळ आंध्रप्रदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याती अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. 
 
"नंदनवनम कॉलनीत राहणाऱ्या अशोक नावाच्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली होती, गेल्या काही दिवसापासून त्यांच्या घरातील व्यक्तींकडून पोट दुखणं, हात-पाय दुखणं यासारख्या तब्येतीच्या तक्रारी येत आहेत.सोमवारी रात्री अशोक कामावरून परत आल्यावर त्यांच्या पत्तीने त्यांना जेवायला भात दिला. तो भात खाण्याच्या योग्यतेचा नव्हता, अशी माहिती मीरपेत पोलिसांनी दिली आहे. 
 
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्लॅस्टिकच्या तांदळासंबंधीत पोस्ट व्हायरल केले जात आहेत. ज्यामुळे मंगळवारी आंध्र प्रदेशातील लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. दुकानातून जमा केलेले तांदळाचे नमुने सध्या तपासले जात आहेत. अहवाल अजून येणं बाकी असल्याने अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात अधिकृत माहिती दिली जात नाही आहे. विशेष म्हणजे वजन आणि उपाय विभागाकडून तांदूळ मिसळण्याच्या  पद्धतीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अंमलबजावणी पथक तयार करण्याची योजना आखली जाते आहे. 
 
फेक किंवा प्लॅस्टिकचा तांदूळ बाजारात विकला जात असल्याची माहिती आम्हाला सोशल मीडियावरून समजली पण या संबंधी वरिष्ठांकडून कुठल्याही सूचना आल्या नाहीत. तरिही चार अन्न निरिक्षकांना विशाखापट्टणममधील मुख्य तांदूळ व्यापाऱ्यांकडे पाठवत असल्याची माहिती वजन आणि उपाय विभागाचे सहाय्यक अन्न नियंत्रक श्रीनिवास राव यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिली आहे.