शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने विमाने खोळंबली

By admin | Updated: January 28, 2016 01:13 IST

विमानांमध्ये बॉम्ब पेरून ठेवल्याची धमकी देणारे चार निनावी फोन कॉल्स दिल्ली आणि बेंगळुरु विमानतळ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्याने बुधवारी प्रचंड खळबळ उडाली.

नवी दिल्ली : विमानांमध्ये बॉम्ब पेरून ठेवल्याची धमकी देणारे चार निनावी फोन कॉल्स दिल्ली आणि बेंगळुरु विमानतळ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्याने बुधवारी प्रचंड खळबळ उडाली. बॉम्बच्या या फोनमुळे दोन आंतरराष्ट्रीय आणि एका देशांतर्गत विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले. गेल्या पाच दिवसांत घडलेल्या अशा प्रकारच्या दुसऱ्या घटनेमुळे विमान प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर एअर इंडिया आणि जेट एअरवेजच्या विमानांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच थांबविण्यात आले तर बेंगळुरु विमानतळावर एअर आशियाच्या एका विमानाचे उड्डाण याच कारणावरून थांबविण्यात आले. नवी दिल्लीहून काठमांडूला जाणाऱ्या दोन विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे फोन कॉल आल्यानंतर या दोन्ही विमानांचे उड्डाण लगेच थांबविण्यात आले. उड्डाण थांबविण्यात आलेले एक विमान एअर इंडियाचे तर दुसरे जेट एअरवेजचे आहे.एअर इंडियाच्या एआय-२१५ आणि जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यू २६० या विमानांचे उड्डाण होण्याच्या काही मिनिटांपूर्वी विमानांमध्ये बॉम्ब पेरून ठेवलेले असल्याचा निनावी फोन विमानतळावरील जेट एअरवेज सुरक्षा कार्यालयाला मिळाला. एअर इंडियाचे विमान दुपारी १.१५ वाजता आणि जेट एअरवेजचे विमान दुपारी १.३० वाजता काठमांडूला उड्डाण करणार होते. फोन आल्यानंतर या दोन्ही विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले. काठमांडूला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देणारा फोन कॉल मिळण्याची पाच दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी शनिवारी जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला होता आणि त्यानंतर विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले होते. परंतु नंतर ती अफवा असल्याचे लक्षात आले.- बुधवारी असाच फोन आल्यानंतर या दोन्ही विमानांमधील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले आणि विमानाने निर्जन स्थळी नेऊन बॉम्बचा कसून शोध घेण्यात आला. परंतु बॉम्ब आढळला नाही आणि ही एक अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. विमानात बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या दोन्ही विमानांनी सायंकाळी ७.५० वाजता काठमांडूकडे उड्डाण केले.बॉम्ब असल्याचा फोन आल्याने बेंगळुरुहून पणजीला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले.