शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

बजेटच्या तारखेवरून सत्ताधारी-विरोधकात संघर्ष

By admin | Updated: January 5, 2017 02:56 IST

नोटाबंदीनंतर सरकार आणि विरोधकात झालेल्या मोठ्या संघर्षानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने येत आहेत.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीनोटाबंदीनंतर सरकार आणि विरोधकात झालेल्या मोठ्या संघर्षानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने येत आहेत. निमित्त आहे १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पाचे. पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तूर्तास अर्थसंकल्प सादर करु नये, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर, सरकार आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणी राष्ट्रपतींकडे दाद मागितली असली तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती यात हस्तक्षेप करणार नाहीत. ते संसदेचे अधिवेशन बोलवू शकतात. कॅबिनेटने केलेल्या शिफारशीनुसार ३१ जानेवारीच्या नियोजित अधिवेशनात राष्ट्रपती काही फेरबदल करतात का ते स्पष्ट झालेले नाही. पण, राष्ट्रपती भवनातील सूत्र असे सांगतात की, राष्ट्रपती यात हस्तक्षेप करण्याची शक्यता कमी आहे. पण, मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम जैदी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे की, पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर करता येईल का? याची पडताळणी करण्यात येईल. दरम्यान, डॉ. जैदी आणि अन्य दोन आयुक्त ए. के. ज्योती व ओ. पी. रावत हे या प्रकरणात केंद्र सरकारला स्पष्टीकरण मागण्यापूर्वी आपसात चर्चा करणार आहेत. अशा प्रकरणात निवडणूक आयोगांतर्गत सहमतीने निर्णय घेतला जातो. पण, मतदानाची वेळ आली तरी सरकारची बाजू प्रबळ आहे. ज्योती आणि रावत यांची मोदी सरकारच्या काळात नियुक्ती झालेली आहे. तर, जैदी हे जुलै २०१७ मध्ये निवृत्त होत आहेत. विरोधकांना एकत्र येण्यासाठी यानिमित्ताने आणखी एक मुद्दा मिळाला आहे. काँग्रेसचे आनंद शर्मा, सपाचे नरेश अग्रवाल, जदयूचे शरद यादव, माकप, आप आणि अन्य पक्षांनी असा आरोप केला आहे की, सरकारने अर्थसंकल्पाची तारीख जाहीर करण्यापूर्वी आमच्याशी विचारविमर्श केला नाही. विरोधकांनी असाही तर्क केला आहे की, यूपीए सरकारने विधानसभा निवडणुकांमुळे २०१२ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन १५ दिवसांसाठी स्थगित केले होते. सशक्त लोकशाहीसाठी अर्थसंकल्प तूर्तास टाळण्यात यावा, ही भाजपची मागणी त्यावेळी मान्य करण्यात आली होती. भाजपने याबाबत म्हटले आहे की, दर वर्षी आणि कधी सहा महिन्यालाही निवडणुका होत असतात. तर, पाच महिन्यांपूर्वीच सरकारने हे स्पष्ट केले होते की, १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. तथापि, रेल्वे अर्थसंकल्प आता वेगळा राहणार नसून एकच अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. त्यानंतर एकाही पक्षाने सरकारशी संपर्क केला नाही. सरकारने देशाच्या हितासाठीच अर्थसंकल्पाच्या तारखात बदल केला आहे. अर्थमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, निवडणुका असलेल्या राज्यांवर अर्थसंकल्पातून प्रभाव पाडण्याचा सरकारचा कुठलाही हेतू नाही. कायद्याचे कुठलेही उल्लंघन होत नसून अर्थसंकल्प स्थगित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अर्थसंकल्प उशिराने सादर करण्याबाबत निवडणूक आयोगही विचारणा करणार नाही, याचा सरकारला विश्वास आहे.