शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘लोकपाल’चे नियम ठरले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 04:51 IST

सहा महिने उलटल्यानंतरही अनिश्चितता; प्रशिक्षण विभागासोबत संवाद

हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अध्यक्षांसह नऊ सदस्यांच्या नियुक्तीसह लोकपाल संस्था होऊन सहा महिने उलटल्यानंतरही कार्मिक व प्रशिक्षण विभागाने ‘लोकपाल’ संस्थेच्या कामकाजासाठी अद्याप नियम आणि कार्यप्रणाली निश्चित करण्यात आलेली नाही.

लोकपाल संस्थेचे अध्यक्ष पिनाकी चंद्र घोष (सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश) हे गेल्या लोकपाल संस्थेसाठी नियम आणि कार्यपद्धती निश्चित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी कार्मिक व प्रशिक्षण विभागासोबत संवाद साधत आहेत. लोकपाल संस्थेचे प्रभावीपणे सुरु करता यावे, यासाठी नियम आणि कार्यप्रणाली निश्चित करणे जरुरी असल्याबाबत ते आग्रही आहेत. भ्रष्टाचारासंबंधी मंत्र्यांसह सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रारदाराला तक्रार करता येऊ शकेल, यासाठीचे प्रारुप कर्मिक व प्रशिक्षण विभागाला तयार करायचा आहे. उच्चपदस्थ व्यक्तींविरुद्ध साध्या कागदाऐवजी विहित नमुन्यातील प्रारुपात तक्रारादाराने तक्रार दाखल करावी, असे सरकारचे मत आहे; परंतु, यासाठीचे प्रारुप अद्याप तयार करण्यात आलेले नाही. मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन लोकपाल संस्था स्थापन केली. नियम आणि कार्यपद्धती अभावी तक्रारींबाबत लोकपाल संस्थेला कार्यवाही करता येत नाही. सरकारी कर्मचांºयाविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणे हाताळणाºया केंद्रीय दक्षता आयोगाला लोकपालाच्या कक्षेत आणावे की नाही, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अंतर्गत सूत्रांनी सांगितले.

लोकपाल कार्यालयाचे कामकाज सध्या चाणक्यपुरीस्थित द अशोक हॉटेलातून चालते. कार्यालयासाठी दुसरी जागा शोधली जात आहे. लोकपालांकडे सहाशेहून अधिक तक्रारी आल्या असून यापैकी बव्हंशी तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत; परंतु, नियम व कार्यपद्धतीअभावी लोकपालांंना कार्यवाही करता येत नाही. विविध तक्रारी प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले. कार्मिक व प्रशिक्षण विभागाशी संपर्क साधला असता एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, नियम आणि कार्यप्रणाली ठरविली जात आहे.आठ सदस्यांत चार माजी न्यायाधीशन्या. घोष हे लोकपाल संस्थेचे अध्यक्ष असून अन्य आठ सदस्यांत चार माजी न्यायाधीश आणि चार माजी सरकारी अधिकारी आहेत. यात माजी न्या. दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अभिलाषा कुमारी आणि अजय कुमार त्रिपाठी तसेच माजी आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम, महाराष्टÑाचे माजी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, माजी आयआरएस अधिकारी महेंद्र सिंग, आयएएस अधिकारी इंद्रजीतप्रसाद गौतम यांचा समावेश आहे.