शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सात रेल्वे उड्डाणपुलांसाठी २२० कोटी प्राप्त पी.जे.रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी ४० लाख : एकनाथराव खडसे यांनी घेतली बैठक

By admin | Updated: June 29, 2016 20:01 IST

जळगाव : नांदुरा व जळगाव जिल्‘ातील सहा रेल्वे उड्डाणपुलांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून २२० कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पाचोरा ते जामनेर या पी.जे.रेल्वे लाईनच्या ब्रॉडगेजला मंजुरी मिळाली असून वाढीव लाईनच्या सर्वेक्षणासाठी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

जळगाव : नांदुरा व जळगाव जिल्‘ातील सहा रेल्वे उड्डाणपुलांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून २२० कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पाचोरा ते जामनेर या पी.जे.रेल्वे लाईनच्या ब्रॉडगेजला मंजुरी मिळाली असून वाढीव लाईनच्या सर्वेक्षणासाठी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
बैठकीला खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, भुसावळ रेल्वे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित ठवरे, दीपक कुमार, सिनिअर सेक्शन इंजिनिअर एन.पी.पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, भूसंपादन अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते. बैठकीत सात रेल्वे उड्डाण पुलांच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीबाबत माहिती देण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे उड्डाणपुलासाठी १०० कोटी, बोदवड उड्डाणपुलासाठी ४० कोटी, सावदा रेल्वे उड्डाणपुलासाठी ३० कोटी, निंभारोसाठी ३२ कोटी, तर रावेर उड्डाणपुलासाठी १७ कोटी ७२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. यात रावेर रेल्वे उड्डाणपुलासाठी राज्य शासनाच्या हिश्यांची ५० टक्के रक्कम प्राप्त झालेली नसल्याची माहिती देण्यात आली. यासह जळगाव शहरातील पिंप्राळा व शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलासाठी प्रत्येकी ५० लाखांचा निधी रेल्वे विभागाकडून प्राप्त झाला आहे. उर्वरित ५० टक्के निधीची रक्कम ही मनपाने उपलब्ध करून द्यायची असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
मनपाची आर्थिकस्थिती चांगली नसल्याने या रेल्वे उड्डाणपुलांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी मनपाचा नाहरकत दाखला आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी निधी प्राप्त झाला असताना त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. जमीन मालकांना रेडिरेकनरच्या प्रचलित नियमानुसार मोबदला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पी.जे.रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी ५० लाख
पाचोरा ते जामनेर ही रेल्वे लाईन ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित करण्यासाठी ११६ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अजिंठा येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पहूर ते अजिंठा या दरम्यानच्या १८.८० किमी तर जामनेर ते बोदवड या ३१.२५ कि.मी.रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली आहे.