शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-जळगाव मार्गासाठी १५५० कोटी रुपये मंजूर एकनाथराव खडसे : रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटी

By admin | Updated: November 27, 2015 21:33 IST

जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्‘ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्‘ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जि.प.चे.मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचला १५५० कोटी रुपये मंजूर केले आहे. तसेच जळगाव जिल्‘ातून जाणार्‍या ५५ कि.मी. (वाकोद ते जळगाव) च्या रस्ते दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खडसे यांनी सांगितले.
रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटी
जिल्‘ातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यासाठी खासदार रक्षा खडसे व खासदार ए.टी.पाटील यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार केंद्र शासनाने रावेर मतदारसंघातील रावेर, पिंप्री, नांदू, नायगाव ते भोळफाटा या राष्ट्रीय मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी, सावदा, हतनूर, मानपूर, चांगदेव ते राष्ट्रीय मार्ग क्रमांक ६ पर्यंतच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी ६ कोटी, कर्की, कोठा, बेलसवाडी, अंतुर्ली ते अंतुर्ली फाटा या रस्त्याच्या दुरस्तीसाठी ६ कोटी तसेच कळमोदा, न्हावी, हिंगोणा या रस्त्यासाठी ५ कोटी अशा एकूण २२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
तरसोद ते पाळधी फाट्यापर्यंत कॉक्रीटीकरण
जळगाव शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तरसोद ते पाळधी फाट्यापर्यंतच्या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाच्या कामाला निधी मिळावा यासाठी आपण नितीन गडकरी यांच्याकडे विनंती केली. त्यानुसार त्यांनी या कामाचा प्रस्ताव मागविला आहे. एका किलोमीटरला ५ कोटी या प्रमाणे ७५ कोटी रुपयांच्या निधीला आठ ते १५ दिवसात तत्त्वता मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद-नाशिक चौपदरीकरणासाठी साडे तीन हजार कोटी
जळगाव- औरंगाबाद रस्त्यासोबतच केंद्र शासनाने औरंगाबाद, येवला, नाशिक या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी साडे तीन हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. २५ डिसेंबर रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.