शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

औरंगाबाद-जळगाव मार्गासाठी १५५० कोटी रुपये मंजूर एकनाथराव खडसे : रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटी

By admin | Updated: November 27, 2015 21:33 IST

जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्‘ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्‘ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जि.प.चे.मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचला १५५० कोटी रुपये मंजूर केले आहे. तसेच जळगाव जिल्‘ातून जाणार्‍या ५५ कि.मी. (वाकोद ते जळगाव) च्या रस्ते दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खडसे यांनी सांगितले.
रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटी
जिल्‘ातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यासाठी खासदार रक्षा खडसे व खासदार ए.टी.पाटील यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार केंद्र शासनाने रावेर मतदारसंघातील रावेर, पिंप्री, नांदू, नायगाव ते भोळफाटा या राष्ट्रीय मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी, सावदा, हतनूर, मानपूर, चांगदेव ते राष्ट्रीय मार्ग क्रमांक ६ पर्यंतच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी ६ कोटी, कर्की, कोठा, बेलसवाडी, अंतुर्ली ते अंतुर्ली फाटा या रस्त्याच्या दुरस्तीसाठी ६ कोटी तसेच कळमोदा, न्हावी, हिंगोणा या रस्त्यासाठी ५ कोटी अशा एकूण २२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
तरसोद ते पाळधी फाट्यापर्यंत कॉक्रीटीकरण
जळगाव शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तरसोद ते पाळधी फाट्यापर्यंतच्या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाच्या कामाला निधी मिळावा यासाठी आपण नितीन गडकरी यांच्याकडे विनंती केली. त्यानुसार त्यांनी या कामाचा प्रस्ताव मागविला आहे. एका किलोमीटरला ५ कोटी या प्रमाणे ७५ कोटी रुपयांच्या निधीला आठ ते १५ दिवसात तत्त्वता मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद-नाशिक चौपदरीकरणासाठी साडे तीन हजार कोटी
जळगाव- औरंगाबाद रस्त्यासोबतच केंद्र शासनाने औरंगाबाद, येवला, नाशिक या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी साडे तीन हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. २५ डिसेंबर रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.