शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

औरंगाबाद-जळगाव मार्गासाठी १५५० कोटी रुपये मंजूर एकनाथराव खडसे : रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटी

By admin | Updated: November 27, 2015 21:33 IST

जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्‘ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्‘ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जि.प.चे.मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचला १५५० कोटी रुपये मंजूर केले आहे. तसेच जळगाव जिल्‘ातून जाणार्‍या ५५ कि.मी. (वाकोद ते जळगाव) च्या रस्ते दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खडसे यांनी सांगितले.
रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटी
जिल्‘ातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यासाठी खासदार रक्षा खडसे व खासदार ए.टी.पाटील यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार केंद्र शासनाने रावेर मतदारसंघातील रावेर, पिंप्री, नांदू, नायगाव ते भोळफाटा या राष्ट्रीय मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी, सावदा, हतनूर, मानपूर, चांगदेव ते राष्ट्रीय मार्ग क्रमांक ६ पर्यंतच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी ६ कोटी, कर्की, कोठा, बेलसवाडी, अंतुर्ली ते अंतुर्ली फाटा या रस्त्याच्या दुरस्तीसाठी ६ कोटी तसेच कळमोदा, न्हावी, हिंगोणा या रस्त्यासाठी ५ कोटी अशा एकूण २२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
तरसोद ते पाळधी फाट्यापर्यंत कॉक्रीटीकरण
जळगाव शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तरसोद ते पाळधी फाट्यापर्यंतच्या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाच्या कामाला निधी मिळावा यासाठी आपण नितीन गडकरी यांच्याकडे विनंती केली. त्यानुसार त्यांनी या कामाचा प्रस्ताव मागविला आहे. एका किलोमीटरला ५ कोटी या प्रमाणे ७५ कोटी रुपयांच्या निधीला आठ ते १५ दिवसात तत्त्वता मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद-नाशिक चौपदरीकरणासाठी साडे तीन हजार कोटी
जळगाव- औरंगाबाद रस्त्यासोबतच केंद्र शासनाने औरंगाबाद, येवला, नाशिक या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी साडे तीन हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. २५ डिसेंबर रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.