रोटरी चर्चासत्र
By admin | Updated: February 29, 2016 22:01 IST
अनिल कांकरिया : राज्य शासनाने छोटे उद्योग व व्यापारी प्रतिष्ठाने सात दिवस उघडावे याबाबत आदेश केले होते. ते या बजेटमध्ये कायम ठेवले आहे. जळगावची ओळख ही दाळ नगरी म्हणून ओळख आहे. दाळीच्या भाववाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचा जळगावला निश्चित लाभ होणार आहे. शेती व शेतकर्यांसाठी चांगल्या तरतुदी अर्थसंकल्पात केल्या आहेत.
रोटरी चर्चासत्र
अनिल कांकरिया : राज्य शासनाने छोटे उद्योग व व्यापारी प्रतिष्ठाने सात दिवस उघडावे याबाबत आदेश केले होते. ते या बजेटमध्ये कायम ठेवले आहे. जळगावची ओळख ही दाळ नगरी म्हणून ओळख आहे. दाळीच्या भाववाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचा जळगावला निश्चित लाभ होणार आहे. शेती व शेतकर्यांसाठी चांगल्या तरतुदी अर्थसंकल्पात केल्या आहेत.सुरेश बंब : प्रारंभी अर्थसंकल्प हा चांगला आहे. मात्र गुंतवणुक वाढावी यासाठी प्रयत्न झालेले नाही. कोणत्याही कर मर्यादेत वाढ नाही. इनकम टॅक्स कमी करणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही. म्युच्युअल फंडची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपली स्थिती भक्कम आहे. त्यासाठी सरकार विशेष काही प्रयत्न करीत नाही. मेक इन इंडियासाठी बजेटमध्ये काहीच नाही.नंदलाल गादिया : दर्जेदार शिक्षणासाठी अर्थसंकल्पात ६२ नवोदय विद्यालय सुरु करण्याबाबत घोषणा झाली आहे. यासह पुढील तीन वर्षात कौशल विकास योजनेतंर्गत एक कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष आहे. मल्टी ट्रेनिंग इन्स्ट्यिूट सुरु करण्यासाठी १७०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.