शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

हिंदुत्वाची विचारसरणी लादल्याने रोहितची आत्महत्या - राहुुल गांधी

By admin | Updated: January 19, 2016 15:04 IST

विद्यापीठ हे ज्ञान मिळवण्याचा केंद्र असून, विद्यार्थ्यांना इथे आपले विचार, नव्या कल्पना मांडण्याचे स्वातंत्र असले पाहिजे.

 ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. १९ - विद्यापीठ हे ज्ञान मिळवण्याचा केंद्र असून, विद्यार्थ्यांना इथे आपले विचार, नव्या कल्पना मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. पण हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठात ठराविक विचारधारा लादण्याचा प्रयत्न झाला असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी म्हणाले. 
हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर विद्यापीठात आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी हैदराबाद विद्यापीठात आले होते. 
रोहितने आत्महत्या केली हे खर असलं तरी, त्याने आत्महत्या करावी अशी स्थिती विद्यापीठाचे कुलगुरु आणि मंत्र्याने निर्माण केली. मंत्री आणि मंत्रालय निष्पक्ष नव्हते असा आरोप राहुल यांनी केला. रोहितच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळाली पाहिजे ही विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. ही नुकसान भरपाई फक्त आर्थिक स्वरुपात नसावी, आदर, नोकरी मिळाली पाहिजे असे राहुल म्हणाले. 
या घटनेला जे कोणी जबाबदार आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे राहुल म्हणाले. विद्यार्थी कुठल्याही जाती, धर्मचा असो त्याला मुक्तपणे आपले विचार, कल्पना मांडण्यासाठी अधिकार मिळालेच पाहिजेत असे राहुल म्हणाले. मी इथे राजकारणी म्हणून नव्हे तर तरुण म्हणून आलो आहे. माझ्या घराचे दरवाजे नेहमीच तुमच्यासाठी उघडे असतील असे राहुल यांनी सांगितले.