शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

रोहित वेमुला भारताच्या भविष्याबद्दल बोलत होता. पण, आरएसएसला ते मान्य नव्हते. - राहुल गांधी

By admin | Updated: February 23, 2016 16:24 IST

रोहित वेमुला भारताच्या भविष्याबद्दल बोलत होता. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते मान्य नव्हते. संघाला आपली विचारसरणी देशात राबवायची होती

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - सरकार फक्त आपल्या यशाबद्दल बोलत आहे मात्र रोहित वेमुला किंवा हरियाणाबद्दल शब्दही उच्चारत नाही. रोहित वेमुला भारताच्या भविष्याबद्दल बोलत होता. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते मान्य नव्हते. संघाला आपली विचारसरणी देशात राबवायची होती . विरोधी बोलणाऱ्यास संपवून टाकण्याचे संघाचे धोरण असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केली आहे. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी जंतर मंतर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात राहुल गांधी सहभागी झाले होते. 
 
देशभरातील विविध विद्यार्थी संघटनांकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात एनएसयूआय, डावे पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या आहेत.
 
राहुल गांधी म्हणाले की, संसदेत आज झालेल्या भाषणात त्यांनी आरएसएस व भाजपावर जारदार टीका केली. ते म्हणाले सरकारने सुरु केलेल्या योजनांबद्दल बोलण्यात येते, पण रोहित वेमुला व हरियानातील परिस्थितीबद्दल काहीच बोलण्यात येत नाही.