शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ंआमदारांच्या हस्तक्षेपाला रोहिणी खडसेंचा चाप अतिक्रमण कारवाई : रामानंदनगर रस्त्यावर चर्चजवळील भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त

By admin | Updated: February 29, 2016 22:01 IST

जळगाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून केल्या जात असलेल्या कारवाईत आमदार सुरेश भोळे यांच्याकडून वारंवार संबंधीत अधिकार्‍यांना फोन करून दबाव आणला जात असल्याचा आरोप होत होता. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर रस्त्यावरील कलेक्टर बंगला ते चर्च दरम्यानच्या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाईस गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला आमदारांमुळे कारवाई करता येत नसल्याचे समजल्याने रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आमदारांचा फोन आल्यास मला फोन करायला सांगा अशी सूचनाच संबंधीत अधिकार्‍यांना केली. त्यानंतर सोमवारी दुपारी या ठिकाणी कारवाई करण्यात आली.

जळगाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून केल्या जात असलेल्या कारवाईत आमदार सुरेश भोळे यांच्याकडून वारंवार संबंधीत अधिकार्‍यांना फोन करून दबाव आणला जात असल्याचा आरोप होत होता. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर रस्त्यावरील कलेक्टर बंगला ते चर्च दरम्यानच्या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाईस गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला आमदारांमुळे कारवाई करता येत नसल्याचे समजल्याने रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आमदारांचा फोन आल्यास मला फोन करायला सांगा अशी सूचनाच संबंधीत अधिकार्‍यांना केली. त्यानंतर सोमवारी दुपारी या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
त्यामुळे आमदारांकडून कुठल्याही कारवाईत फोन करून हस्तक्षेप करण्यास आळा बसेल, असे मानले जात आहे.
दरम्यान आयुक्तांकडे सुरू असलेल्या बैठकीतच नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनीही रोहिणी खडसे यांची तक्रार आयुक्तांच्या कानावर घालत अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्याची तक्रार केली. त्यामुळे आयुक्तांनी अतिक्रमण अधीक्षकांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम.खान, कैलास गायकवाड यांच्यासह कर्मचार्‍यांनी कारवाई केली.


पाचव्यांदा कारवाई
या अतिक्रमणावर अतिक्रमण विभागातर्फे पाचव्यांदा ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मात्र दरवेळी कारवाई केल्यानंतर जप्त केलेले साहित्य परत मिळत असल्याने हॉकर्सचे अतिक्रमण जैसे-थे होत होते. तसेच अतिक्रमण विभागातील एक कर्मचारीच चिरीमिरी घेऊन या अतिक्रमणधारकांच्या गाड्या सोडून देत असल्याने अतिक्रमण जैसे-थे होत होते. आता नवीन ठरावानुसार जप्त केलेल्या वस्तू परत मिळणार नाहीत. त्यामुळे परत या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---- इन्फो---
लोटगाड्या, मालवाहू रिक्षा जप्त
मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने या रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्या, तसेच एक मालवाहू रिक्षाही जप्त करण्यात आली. ट्रकभरून हातगाड्या जप्त करण्यात आल्या. त्यावरील भाजीपाला मात्र विक्रेत्यांना परत देण्यात आला. जप्त केलेला माल नवीन ठरावानुसार आता परत दिला जाणार नसून त्याचा लिलाव केला जाणार आहे.