शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

‘ओखी’चा धोका टळला, आतापर्यंत ३९ बळी; १६७ मच्छीमार बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 05:07 IST

ओखी चक्रीवादळात तामिळनाडू आणि केरळातील ३९ जणांचा मृत्यू झाला असून १६७ मच्छीमार बेपत्ता आहेत. वेंगुर्ले बंदरात उभ्या केलेल्या सात होड्या समुद्रात बुडाल्या.

नवी दिल्ली/मुंबई : ओखी चक्रीवादळात तामिळनाडू आणि केरळातील ३९ जणांचा मृत्यू झाला असून १६७ मच्छीमार बेपत्ता आहेत. वेंगुर्ले बंदरात उभ्या केलेल्या सात होड्या समुद्रात बुडाल्या. या वादळाचा प्रभाव कमी झाला असून ते गुजरातकडे सरकले असल्यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीचा धोका टळला आहे.मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मंगळवारी पावसाच्या सरी कोसळल्या. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाºयावर बुधवारी ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. ठिकठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.बचाव पथकाने ५५६ मच्छीमारांना वाचविले आहे. तामिळनाडू व केरळचे बोटींसह वाहून गेलेले ८०९ मच्छीमार किनाºयावर पोहोचले. लक्षद्वीपमधील ३३ पर्यटक सुरक्षित आहेत. चक्रीवादळाने गुजरात, दमण, दीव व दादरा नगर हवेली येथे मोठ्या नुकसानाची शक्यता आहे.लक्षद्वीपमध्ये मदतओखीमुळे प्रभावित झालेल्या लक्षद्वीपमधील नागरिकांना भारतीय नौदलाने मदतीचा हात दिला. नौदलाने जहाजातून जीवनावश्यक साहित्य कवारट्टी आणि कल्पनी बेटावरील नागरिकांना पोहोचविले.राज्यातील शेतकरी चिंतेतओखी वादळामुळे राज्यातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे द्राक्ष, स्ट्रॉबेरी, आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटीसह वर्सोवा चौपाटीवर उसळलेल्या समुद्राच्या लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली होती. मात्र मुंबईपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ओखी वादळाने दक्षिण गुजरातकडे आगेकूच केल्याने मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला.पूर्वमध्य अरबी समुद्रावर आलेले ओखी चक्रीवादळ गुजरातकडे सरकले असले तरी पावसामुळे समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे शक्यतो समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.अफवांचाही पाऊस!आज दिवसभर अफवांचा पाऊसहीजोरदार होता. चक्रीवादळामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गारा पडल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता, तर मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतू (सी-लिंक) आणि पेडर रोड खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवल्याची अफवा मंगळवारी व्हायरल झाली होती.नेत्यांच्या सभा रद्द : चक्रीवादळ सुरतपासून ३९० किमी अंतरावर असून वादळामुळे गुजरातमध्ये अनेक नेत्यांच्या प्रचारसभा रद्द झाल्या आहेत.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ