शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

प्रशासकीय सेवेत पदोन्नतीने येण्यास यापुढे कठोर प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:57 IST

सरकारी अधिकाऱ्यांना पदोन्नतीने भारतीय प्रशासकीय सेवेत (आयपीएस) दाखल होण्याची सोय असली तरी यापुढे त्यासाठी कठोर प्रशिक्षणाला सामोेरे जावे लागणार आहे.

विशेष प्रतिनिधीनवी दिल्ली - सरकारी अधिकाऱ्यांना पदोन्नतीने भारतीय प्रशासकीय सेवेत (आयपीएस) दाखल होण्याची सोय असली तरी यापुढे त्यासाठी कठोर प्रशिक्षणाला सामोेरे जावे लागणार आहे. तसेच पदोन्नतीनंतर कोणत्याही राज्यात सेवेसाठी जाण्याचे बंधन अधिकाºयांवर असेल.आयपीएस केडरमध्ये पदोन्नत अधिकाºयांसाठी एक तृतियांश जागा असतात. यापैकी बहुतांश उमेदवार साधारणत: जिल्हाधिकारी वा समकक्ष पदांवर त्याच राज्यात रुजू होतात. पदोन्नतीद्वारे मिळालेल्या या संधीचा लाभ घेणाºयांचे वय ४0 ते ४५असते. राज्य लोकसेवा आयोगामार्फत सरकारी नोकरीत आल्यानंतर, आयएएस सेवेत येणाºयांना आता नियिमित्ी आयएएस अधिकाºयांप्रमाणे कठोर सामोरे जावे लागणार आहे. विविध राज्यांत कामाच्या अनुभवासह त्यांना प्रशिक्षण केंद्रातही काही आठवड्यांचे ट्रेनिंग देण्याचा विचार आहे. मोदी सरकारने पदोन्नत अधिकाºयांसाठी नवा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला असून, येत्या वर्षापासून तो अंमलात येईल, असे समजते.मध्यमवयीन पदोन्नत अधिकाºयांना साधारणत: जिल्हाधिकारीपदी संधी मिळते. या पद्धतीविषयी पंतप्रधान मोदींनी मध्यंतरी चिंता व्यक्त केली. प्रौढांऐवजी तरुणांना ही संधी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. राज्य प्रशासकीय सेवेद्वारे ज्या राज्यांत असे अधिकारी कार्यरत होते, त्यांना आयएएसच्या पदोन्नतीनंतर त्याच राज्याचे केडर मिळण्याची प्रथाही आता संपुष्टात येणार आहे.पुढल्या वर्षापासून यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्यांना राज्यांच्या केडरऐवजी झोनची निवड करावी लागेल. सनदी अधिकाºयांसाठी देशात २६ केडर आहेत. नव्या व्यवस्थेत पाच झोनमध्ये २६ केडरचा समावेश होईल. हा बदल पुढल्या वर्षी अमलात येत असून, याची अधिसूचनाही लवकरच निघेल. यूपीएससी परीक्षेला बसणाºया उमेदवाराला मुलाखतीआधी राज्याऐवजी झोनची निवड करावी लागेल. सनदी अधिकाºयाला विशिष्ट राज्याऐवजी झोनमधील कोणत्याही राज्यात सरकार पाठवू शकेल. देशव्यापी सेवेतील अधिकारी एकाच राज्यात दीर्घकाळ राहिल्यास त्यांच्या सेवेचा व अनुभवाचा लाभ सरकारला होत नाही. त्याऐवजी विविध भागांत त्यांनी काम केल्यास त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो. धोरण ठरवताना ते सहभागी होतात तेव्हा त्यांच्या व्यापक अनुभवाचा लाभ देशाला होतो, अशी यामागील भूमिका आहे.प्रस्ताव घेतला मागेयूपीएससीच्या अंतिम मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना प्रशिक्षण काळात आणखी नव्या परीक्षा द्याव्यात, त्यात जे मिळालेले गुण आधीच्या गुणांत समाविष्ट करून रँक ठरवली जाईल. अशा एकूण गुणांच्या बळावर सरकारी सेवा व केडरची नियुक्ती करता येईल, असा प्रस्ताव डिपार्टमेंट आॅफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग (डीओपीटी)ने तयार केला होता. तो या वर्षापासून लागू करण्याची योजना होती. तथापि वाद उद्भवल्यानंतर, पंतप्रधानांनीच प्रस्ताव मागे घ्यायला लावला असे समजले.

टॅग्स :Governmentसरकारnewsबातम्या