शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

शनि दर्शनाबाबत घटनेने दिलेल्या हक्कांचे पालन व्हावे

By admin | Updated: February 7, 2016 22:46 IST

जळगाव- शनिशिंगणापूर येथील शनि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा मुद्दा चर्चेत आहे. या प्रकरणात शासनाने घटनेने दिलेल्या स्त्री, पुरूष समानतेच्या हक्कांना अधीन राहून निर्णय घ्यावा, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोलकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

जळगाव- शनिशिंगणापूर येथील शनि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा मुद्दा चर्चेत आहे. या प्रकरणात शासनाने घटनेने दिलेल्या स्त्री, पुरूष समानतेच्या हक्कांना अधीन राहून निर्णय घ्यावा, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोलकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
डॉ.दाभोळकर शहरात समता शिक्षक परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न- शनि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधीच्या मुद्द्यावर काय मत आहे?
डॉ.दाभोळकर- शनि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी २००० या वर्षर्ी अंनिसने आंदोलन केले होते. घटनेने आपल्याला समान अधिकार दिले आहेत. स्त्री, पुरूष समानतेच्या हक्कांचे पालन या मुद्द्यावरही व्हायला हवे. आम्ही या मुद्द्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तामिळनाडूमधील शबरी मला मंदिरातही महिलांना प्रवेश मिळावा याबाबतही आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर एकत्रीतपणे कामकाज व्हावे.
प्रश्न- डॉ.नरंेद्र दाभोळकर यांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. याविषयी काय वाटते?
डॉ.दाभोळकर- डॉ.दाभोळकरांसह गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकसारख्या पिस्तुलाचा वापर झाल्याचा अहवाल समोर आला आहे. पण शासन तपासाबाबत उदासीन आहे. आघाडी सरकारच्या काळात डॉ.दाभोळकर यांची हत्या झाली. त्या काळातही सरकार आणि विरोधक याविषयी गंभीर नव्हते.
प्रश्न- जायपंचायतींचा मुद्दा ऐरणीवर आहे. ही समस्या कशी दूर करता येईल?
डॉ.दाभोळकर- जात पंचायती नष्ट करण्यासाठी कायदा करायला हवा. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जात पंचायतींच्या प्रमुखांनीही त्या नष्ट करण्यासाठी पुढे यावे. अशा पुढाकाराने राज्यात आठ जात पंचायतींना मूठमाती दिली गेली. ग्रामीण भागात जाऊन प्रबोधन कार्यक्रमही हाती घेण्याची आवश्यकता आहे.
प्रश्न- अंनिसची चळवळ पुढे नेण्यासाठी कुठला कार्यक्रम आहे का?
डॉ.दाभोळकर- अंनिसची चळवळ राज्यात रूजली, वाढली व पुढे जात आहे. डॉ.दाभोळकर यांच्या हत्येनंतर ही चळवळ थांबेल, असे काहींना वाटत होते. पण आमचा एकही कार्यक्रम रद्द झालेला नाही. पुढे विद्यार्थ्यांमध्ये जाऊन आम्ही काम करणार आहोत. जाती, पातींच्या भिंती दूर कशा होतील यासाठी प्रबोधन केले जाईल. देवाच्या नावावर होणारी लुटमार, पिळवणूक, शोषण याला आमचा नेहमीच विरोध राहील.