शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शनि दर्शनाबाबत घटनेने दिलेल्या हक्कांचे पालन व्हावे

By admin | Updated: February 7, 2016 22:46 IST

जळगाव- शनिशिंगणापूर येथील शनि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा मुद्दा चर्चेत आहे. या प्रकरणात शासनाने घटनेने दिलेल्या स्त्री, पुरूष समानतेच्या हक्कांना अधीन राहून निर्णय घ्यावा, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोलकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

जळगाव- शनिशिंगणापूर येथील शनि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा मुद्दा चर्चेत आहे. या प्रकरणात शासनाने घटनेने दिलेल्या स्त्री, पुरूष समानतेच्या हक्कांना अधीन राहून निर्णय घ्यावा, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोलकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
डॉ.दाभोळकर शहरात समता शिक्षक परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न- शनि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधीच्या मुद्द्यावर काय मत आहे?
डॉ.दाभोळकर- शनि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी २००० या वर्षर्ी अंनिसने आंदोलन केले होते. घटनेने आपल्याला समान अधिकार दिले आहेत. स्त्री, पुरूष समानतेच्या हक्कांचे पालन या मुद्द्यावरही व्हायला हवे. आम्ही या मुद्द्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तामिळनाडूमधील शबरी मला मंदिरातही महिलांना प्रवेश मिळावा याबाबतही आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर एकत्रीतपणे कामकाज व्हावे.
प्रश्न- डॉ.नरंेद्र दाभोळकर यांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. याविषयी काय वाटते?
डॉ.दाभोळकर- डॉ.दाभोळकरांसह गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकसारख्या पिस्तुलाचा वापर झाल्याचा अहवाल समोर आला आहे. पण शासन तपासाबाबत उदासीन आहे. आघाडी सरकारच्या काळात डॉ.दाभोळकर यांची हत्या झाली. त्या काळातही सरकार आणि विरोधक याविषयी गंभीर नव्हते.
प्रश्न- जायपंचायतींचा मुद्दा ऐरणीवर आहे. ही समस्या कशी दूर करता येईल?
डॉ.दाभोळकर- जात पंचायती नष्ट करण्यासाठी कायदा करायला हवा. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जात पंचायतींच्या प्रमुखांनीही त्या नष्ट करण्यासाठी पुढे यावे. अशा पुढाकाराने राज्यात आठ जात पंचायतींना मूठमाती दिली गेली. ग्रामीण भागात जाऊन प्रबोधन कार्यक्रमही हाती घेण्याची आवश्यकता आहे.
प्रश्न- अंनिसची चळवळ पुढे नेण्यासाठी कुठला कार्यक्रम आहे का?
डॉ.दाभोळकर- अंनिसची चळवळ राज्यात रूजली, वाढली व पुढे जात आहे. डॉ.दाभोळकर यांच्या हत्येनंतर ही चळवळ थांबेल, असे काहींना वाटत होते. पण आमचा एकही कार्यक्रम रद्द झालेला नाही. पुढे विद्यार्थ्यांमध्ये जाऊन आम्ही काम करणार आहोत. जाती, पातींच्या भिंती दूर कशा होतील यासाठी प्रबोधन केले जाईल. देवाच्या नावावर होणारी लुटमार, पिळवणूक, शोषण याला आमचा नेहमीच विरोध राहील.