शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

राईट टू रिकॉल... वरुण यांच्या विधेयकाचे अण्णांकडून समर्थन

By admin | Updated: May 19, 2017 02:05 IST

कोणत्याही मतदारसंघात ७५ टक्के मतदार निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीच्या कामगिरीवर नाखुश असतील, तर दोन वर्षाच्या आत त्याची निवड रद्द करून त्या लोकप्रतिनिधीला

- सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोणत्याही मतदारसंघात ७५ टक्के मतदार निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीच्या कामगिरीवर नाखुश असतील, तर दोन वर्षाच्या आत त्याची निवड रद्द करून त्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार (राईट टू रिकॉल) हे खाजगी विधेयक खासदार वरूण गांधींनी मार्च महिन्यात संसदेत सादर केले. समाजसेवक अण्णा हजारेंनी वरूण गांधींना या विधेयकाबद्दल लेखी पत्र पाठवून त्यांचे जोरदार समर्थन केले आहे. वरूण गांधींनी अण्णांचे पत्र व्टीटरवर टाकले. दिल्लीत लोकमतशी बोलतांना या विषयावरची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. प्रस्तुत विधेयकाबाबत वरूण गांधींचे मनापासून अभिनंदन करतांना अण्णा हजारे पत्रात म्हणतात, ‘ सर्व उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार मान्य नाही यासाठी मतदान प्रक्रियेत ‘नोटा’ची तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे, मात्र ती पुरेशी नाही, हे गेल्या अनेक निवडणुकांचे निकाल पहाता सिध्द झाले आहे. त्या दृष्टिने वरूण गांधींनी सादर केलेले विधेयक अधिक परिणामकारक आहे असे मला वाटते. संसदेत हे विधेयक मंजूर झाले तर भारतीय लोकशाहीत क्रांतीकारक बदल होईल, अशी मला अपेक्षा आहे.अण्णा हजारेंचे विधेयकाला समर्थन प्राप्त झाल्यामुळे वरूण गांधी अतिशय खुश आहेत. लोकमतशी बोलतांना गांधी म्हणाले, ‘मला कल्पना आहे की खाजगी विधेयक संसदेत क्वचितच मंजूर होते. तथापि विधेयकाच्या निमित्ताने या विषयावर देशव्यापी चर्चा संवाद घडेल, अण्णा हजारेंसारख्या ज्येष्ठ समाजसेवकांनी स्वयंस्फूर्तीने त्याला पाठिंबा द्यावा, ही केवळ मोठी घटना नाही तर विधेयकाच्या मसुद्याला मिळालेली सर्वात मोठी पावती आहे. अवघ्या दोन महिन्यात हा विषय लोकांपर्यंत सकारात्मक पध्दतीने पोहोचला ही सर्वाधिक आनंदाची बाब आहे’, असे वरूण म्हणाले.