शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

दरवाढीचा डोस 509 औषधे महाग

By admin | Updated: April 9, 2015 04:39 IST

साध्या सर्दी-खोकला, तापाच्या आजारापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या तब्बल ५०९ औषधांच्या किमतीमध्ये किमान दीड

नवी दिल्ली : साध्या सर्दी-खोकला, तापाच्या आजारापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या तब्बल ५०९ औषधांच्या किमतीमध्ये किमान दीड रुपयापासून कमाल १,६०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली असून, नवे दर एक एप्रिलपासून लागू झाले आहेत. या अचानक औषध दरवाढीमागचे कारण मात्र कच्चा मालातील वाढ अथवा संशोधन खर्चातील वाढ हे नसून, याचा संबंध थेट महागाईशी जोडला गेला आहे. देशामध्ये महागाई मोजण्यासाठी आधार घेण्यात येणाऱ्या घाऊक मूल्यांक वार्षिक निर्देशांकाशी औषधांच्या किमती जोडण्यात आल्या असून, या निर्देशांकात वर्षाखेरीस होणाऱ्या हालचालींचे प्रतिबिंब औषधांच्या किमतीवर पडणार आहे. टक्केवारीत ही वाढ ३.८४ टक्के इतकी किरकोळ दिसत असली तरी मधुमेह, कर्करोग आणि कावीळ या आणि यासारख्या काही आजारांवरील औषधांच्या किमती आताच महाग असल्याने त्यावर ही नवी आकारणी होणार असल्याने यांच्या किमतीत अधिक वाढ होईल. राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या अधिसूचनेनुसार, २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये घाऊक मूल्यांक वार्षिक निर्देशांक ३.८४ टक्क्यांनी वाढला आहे. त्यानुसार नवी आकारणी करण्यात येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)