शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रायसोनी पतसंस्थेच्या मालमत्तेवर टाच!

By admin | Updated: March 25, 2015 23:53 IST

सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यासंदर्भात सर्व संचालकांची सुनावणी घेऊन पतसंस्थेसह व संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी बुधवारी दिले.

रघुनाथ पांडे - नवी दिल्लीजळगावात मुख्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यासंदर्भात सर्व संचालकांची सुनावणी घेऊन पतसंस्थेसह व संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी बुधवारी दिले. तर, केंद्रीय सहकार विभागाने पतसंस्था बंद करण्याचा इशारा पतसंस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. मल्टिस्टेट को-आॅप. सोसायटी कायदा २००२ नुसार मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश लवकरच काढण्यात येणार असून सध्या पतसंस्थेचे संचालक अटकेत असल्याने त्यांची सुनावणी दिल्लीत घेण्याची प्रक्रिया कशी असेल, त्यावरही विधि विभागाचे मत मागविण्यात येत आहे, असे अधिकृत सूत्राने सांगितले. शिवाय केंद्रीय सहकार विभागाने पतसंस्थेच्या प्रबंध संचालकांना तीन मार्च रोजी नोटीस देऊन ठेवीदारांना त्यांची रक्कम १५ दिवसांत परत करण्याचे सांगून तसे न केल्यास पतसंस्था बंद (वार्इंडअप) करण्याची कारवाई केली जाईल, असे पत्र दिले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, नाबार्ड, पुण्याचे सहकार सहायक निबंधक, दोन खासदार यांच्यासह जळगाव, सातारा, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, नांदेड, परभणी, सोलापूर येथील तब्बल २२१ तक्रारकर्त्यांनी या पतसंस्थेच्या गैरव्यवहाराबद्दल गेल्या तीन महिन्यांत पत्रे दिली. त्यातून हा घोटाळा १२ हजार कोटींवर असल्याचे कृषिविभागातील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत लक्षात आल्याने बुधवारी कृषिमंत्री सिंह यांनी बुधवारी ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याच्या सूचना देत पंतसंस्था अवसायनात टाकून त्यावर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू करा,अशी ताकीद दिली. सहकार विभागाचे कायदा संचालक पी. संपथ व केंद्रीय सहकार विभागाचे उपसंचालक जितेंदर नागर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लोकांचा कष्टाचा पैसा पतसंस्थेत अडल्याने त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल याचा अंदाज येणार नाही, त्यामुळे खातेदारांची रक्कम तातडीने मिळावी, यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या. ४भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळ््यासंदर्भात कारवाई करण्यासाठी तसेच ठेवीदाराना त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी केंद्र सरकाने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी पंतसंस्थेचे खातेदार सतीश बोधनकर, विजय मनुरकर, राजेश उत्तरवार यांच्यासह काही ठेवीदार राजधानीतील जंतरमंतर येथे २६ मार्चासून उपोषण करणार आहेत.