शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रायसोनी पतसंस्थेच्या मालमत्तेवर टाच!

By admin | Updated: March 25, 2015 23:53 IST

सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यासंदर्भात सर्व संचालकांची सुनावणी घेऊन पतसंस्थेसह व संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी बुधवारी दिले.

रघुनाथ पांडे - नवी दिल्लीजळगावात मुख्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यासंदर्भात सर्व संचालकांची सुनावणी घेऊन पतसंस्थेसह व संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी बुधवारी दिले. तर, केंद्रीय सहकार विभागाने पतसंस्था बंद करण्याचा इशारा पतसंस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. मल्टिस्टेट को-आॅप. सोसायटी कायदा २००२ नुसार मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश लवकरच काढण्यात येणार असून सध्या पतसंस्थेचे संचालक अटकेत असल्याने त्यांची सुनावणी दिल्लीत घेण्याची प्रक्रिया कशी असेल, त्यावरही विधि विभागाचे मत मागविण्यात येत आहे, असे अधिकृत सूत्राने सांगितले. शिवाय केंद्रीय सहकार विभागाने पतसंस्थेच्या प्रबंध संचालकांना तीन मार्च रोजी नोटीस देऊन ठेवीदारांना त्यांची रक्कम १५ दिवसांत परत करण्याचे सांगून तसे न केल्यास पतसंस्था बंद (वार्इंडअप) करण्याची कारवाई केली जाईल, असे पत्र दिले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, नाबार्ड, पुण्याचे सहकार सहायक निबंधक, दोन खासदार यांच्यासह जळगाव, सातारा, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, नांदेड, परभणी, सोलापूर येथील तब्बल २२१ तक्रारकर्त्यांनी या पतसंस्थेच्या गैरव्यवहाराबद्दल गेल्या तीन महिन्यांत पत्रे दिली. त्यातून हा घोटाळा १२ हजार कोटींवर असल्याचे कृषिविभागातील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत लक्षात आल्याने बुधवारी कृषिमंत्री सिंह यांनी बुधवारी ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याच्या सूचना देत पंतसंस्था अवसायनात टाकून त्यावर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू करा,अशी ताकीद दिली. सहकार विभागाचे कायदा संचालक पी. संपथ व केंद्रीय सहकार विभागाचे उपसंचालक जितेंदर नागर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लोकांचा कष्टाचा पैसा पतसंस्थेत अडल्याने त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल याचा अंदाज येणार नाही, त्यामुळे खातेदारांची रक्कम तातडीने मिळावी, यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या. ४भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळ््यासंदर्भात कारवाई करण्यासाठी तसेच ठेवीदाराना त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी केंद्र सरकाने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी पंतसंस्थेचे खातेदार सतीश बोधनकर, विजय मनुरकर, राजेश उत्तरवार यांच्यासह काही ठेवीदार राजधानीतील जंतरमंतर येथे २६ मार्चासून उपोषण करणार आहेत.