शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

घटनापीठ करणार समलैंगिकतेवर फेरविचार

By admin | Updated: February 3, 2016 02:53 IST

भादंविच्या कलम ३७७ अंतर्गत दोन वयस्कांमध्ये परस्पर सहमतीने समलैंगिक संबंध प्रस्थापित करणे हा गुन्हा ठरविणाऱ्या निकालाची फेरतपासणी करण्याची मागणी

नवी दिल्ली : भादंविच्या कलम ३७७ अंतर्गत दोन वयस्कांमध्ये परस्पर सहमतीने समलैंगिक संबंध प्रस्थापित करणे हा गुन्हा ठरविणाऱ्या निकालाची फेरतपासणी करण्याची मागणी करणारी सुधारणात्मक याचिका (क्युरेटिव्ह) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सुपूर्द केली आहे.या प्रकरणात राज्यघटनेशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे अंतर्भूत असल्याकारणाने हा मुद्दा पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सुपूर्द करणे उचित ठरेल, असे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि न्यायाधीशद्वय ए. आर. दवे व जे. एस. खेहर यांच्या तीन न्यायाधीशांच्या पीठाने सांगितले. भविष्यात हे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करण्यात येईल, असेही या पीठाने स्पष्ट केले.सर्वोच्च न्यायालयाचा ११ डिसेंबर २०१३ रोजीचा निकाल आणि पुनरीक्षण याचिकेवर फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या एकूण आठ सुधारणात्मक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. आपल्या याच निकालात सर्वोच्च न्यायालयाने भादंविच्या कलम ३७७ (अनैसर्गिक लैंगिक गुन्हे) अंतर्गत केले जाणारे गुन्हे गुन्ह्यांच्या श्रेणीमधून वगळण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरविला होता, असे या पीठाला सांगण्यात आले होते. चर्चेस आॅफ द नॉर्दन इंडिया आणि आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड समलैंगिकतेला गुन्हा न ठरविण्याच्या विरोधात आहेत, असेही या पीठाला सांगण्यात आले. सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, या महत्त्वपूर्ण मुद्यावर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानेच विचार करण्याची आवश्यकता आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. हा मुद्दा पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी स्वागत केले आहे. ‘चूक सुधारण्यात येत असल्याने मला आनंद झाला आहे. ही केवळ पहिली पायरी आहे. सर्वोच्च न्यायालय जेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करेल, त्या दिवसाची मला प्रतीक्षा आहे,’ असे चिदंबरम म्हणाले.> या प्रकरणाची सुनावणी सुरू होताच, भादंविचे कलम ३७७ गुन्ह्याच्या श्रेणीबाहेर ठेवण्याचे समर्थन करणाऱ्या वकिलांपैकी एक कपिल सिब्बल यांनी, ‘हे प्रकरण फार मोठ्या संवैधानिक मुद्याशी संबंधित आहे,’ असे सांगितले. हे प्रकरण अत्यंत खासगी आणि जीवनाच्या अतिशय मौल्यवान भागाशी, तसेच आपल्या चार भिंतींच्या आड असलेल्या लैंगिकतेच्या अधिकाराशी संबंधित आहे; परंतु त्या अधिकारालाच घटनाबाह्य ठरविण्यात आले आहे. मानवीय लैंगिक संबंध कलंकित ठरवू नये, असे सिब्बल म्हणाले.