(सुधारित : वाचली) एचसीएल कंपनीचे बिल रोखणार महापालिका सभेत निर्णय : कंपनीच्या पैशाचा हिशोबच नाही
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
कोल्हापूर : शहरवासीयांना सर्व प्रकारचे दाखले संगणकावर देणारी एचसीएल कंपनी झालेल्या कराराप्रमाणे काम करीत नसल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. जोपर्यंत कंपनी सर्व यंत्रणा अपडेट करीत नाही तोपर्यंत या कंपनीचे बिल थांबविण्याचा निर्णय आज, शनिवारी महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. दरम्यान, लवकरच या कंपनीच्या अधिकार्यांबरोबर बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही प्रभारी आयुक्त नितीन देसाई यांनी सभागृहाला दिली.
(सुधारित : वाचली) एचसीएल कंपनीचे बिल रोखणार महापालिका सभेत निर्णय : कंपनीच्या पैशाचा हिशोबच नाही
कोल्हापूर : शहरवासीयांना सर्व प्रकारचे दाखले संगणकावर देणारी एचसीएल कंपनी झालेल्या कराराप्रमाणे काम करीत नसल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. जोपर्यंत कंपनी सर्व यंत्रणा अपडेट करीत नाही तोपर्यंत या कंपनीचे बिल थांबविण्याचा निर्णय आज, शनिवारी महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. दरम्यान, लवकरच या कंपनीच्या अधिकार्यांबरोबर बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही प्रभारी आयुक्त नितीन देसाई यांनी सभागृहाला दिली. एचसीएल कंपनी करारातील अटींप्रमाणे काम करीत नाही. सर्व यंत्रणा पाच वर्षांत अपडेट करायची होती; परंतु ती त्यांनी केलेली नाही. त्याचा फटका महापालिकेला बसत आहे. कंपनीला दिलेल्या २ कोटी ७५ लाखांच्या बिलावर सेंट्रल ऑडिट रिपोर्टमध्ये आक्षेप घेतले आहेत. कंपनीने ताळेबंद दिलेला नाही. कंपनीला किती पैसे दिले याचा हिशेब पालिकेकडे नाही. कंपनी आपले काम शंभर टक्के करीत नाही याकडे महेश कदम यांनी लक्ष वेधले. संबंधित विषयाला उत्तर द्यायला जबाबदार अधिकारी नसल्याने प्रभारी आयुक्त देसाई यांनी पुढील सभेत याबाबत माहिती देतो, असे सांगितले; परंतु त्यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. निशिकांत मेथे, मुरलीधर जाधव यांनी या कंपनीला कोणी अधिकारी सामील आहेत का, अशी शंका उपस्थित केली. जर कंपनी पूर्ण क्षमतेने काम करीत नसेल तर त्यांचे बिल देण्याचे थांबवा, अशी मागणी संभाजी जाधव यांनी केली. त्यावेळी प्रभारी आयुक्त देसाई व उपायुक्त विजय खोराटे यांनी बिले थांबविण्याची ग्वाही दिली. अधिकारी व कर्मचार्यांच्या पदोन्नतीवर सभागृहात चर्चा झाली. प्रशासन जाणीवपूर्वक पदोन्नती डावलत आहे. यामागे कोणाचा अहंकार नडला आहे का, अशी विचारणा राजू लाटकर यांनी केली. २६ वर्षे पदोन्नतीपासून कर्मचारी वंचित राहत असतील ती प्रशासनाची चूक असल्याचे लाटकर म्हणाले. प्रशासनातील एक टोळके विद्वत्ता असलेल्यांना पुढे जाऊ देत नाही, असा टोला भूपाल शेटे यांनी हाणला. शिवाजी पेठेतील रस्ता महापालिका करणार रंकाळा टॉवर ते खर्डेकर रुग्णालय व पुढे इराणी खाणीपर्यंतचा रस्ता आयआरबीने करायचा होता. त्यांनी तो न केल्यामुळे हा रस्ता आता महापालिका स्वनिधीतून करणार आहे. तसा निर्णय सभेत घेण्यात आला. रस्ता खर्डेकर रुग्णालयापर्यंतच करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते; मात्र त्याला जोरदार हरकत घेत शारंगधर देशमुख यांनी तो इराणी खाणीपर्यंत करण्याचा आग्रह धरला. (प्रतिनिधी)