शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

(सुधारित : वाचली) एचसीएल कंपनीचे बिल रोखणार महापालिका सभेत निर्णय : कंपनीच्या पैशाचा हिशोबच नाही

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

कोल्हापूर : शहरवासीयांना सर्व प्रकारचे दाखले संगणकावर देणारी एचसीएल कंपनी झालेल्या कराराप्रमाणे काम करीत नसल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. जोपर्यंत कंपनी सर्व यंत्रणा अपडेट करीत नाही तोपर्यंत या कंपनीचे बिल थांबविण्याचा निर्णय आज, शनिवारी महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. दरम्यान, लवकरच या कंपनीच्या अधिकार्‍यांबरोबर बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही प्रभारी आयुक्त नितीन देसाई यांनी सभागृहाला दिली.

कोल्हापूर : शहरवासीयांना सर्व प्रकारचे दाखले संगणकावर देणारी एचसीएल कंपनी झालेल्या कराराप्रमाणे काम करीत नसल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. जोपर्यंत कंपनी सर्व यंत्रणा अपडेट करीत नाही तोपर्यंत या कंपनीचे बिल थांबविण्याचा निर्णय आज, शनिवारी महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. दरम्यान, लवकरच या कंपनीच्या अधिकार्‍यांबरोबर बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही प्रभारी आयुक्त नितीन देसाई यांनी सभागृहाला दिली.
एचसीएल कंपनी करारातील अटींप्रमाणे काम करीत नाही. सर्व यंत्रणा पाच वर्षांत अपडेट करायची होती; परंतु ती त्यांनी केलेली नाही. त्याचा फटका महापालिकेला बसत आहे. कंपनीला दिलेल्या २ कोटी ७५ लाखांच्या बिलावर सेंट्रल ऑडिट रिपोर्टमध्ये आक्षेप घेतले आहेत. कंपनीने ताळेबंद दिलेला नाही. कंपनीला किती पैसे दिले याचा हिशेब पालिकेकडे नाही. कंपनी आपले काम शंभर टक्के करीत नाही याकडे महेश कदम यांनी लक्ष वेधले. संबंधित विषयाला उत्तर द्यायला जबाबदार अधिकारी नसल्याने प्रभारी आयुक्त देसाई यांनी पुढील सभेत याबाबत माहिती देतो, असे सांगितले; परंतु त्यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही.
निशिकांत मेथे, मुरलीधर जाधव यांनी या कंपनीला कोणी अधिकारी सामील आहेत का, अशी शंका उपस्थित केली. जर कंपनी पूर्ण क्षमतेने काम करीत नसेल तर त्यांचे बिल देण्याचे थांबवा, अशी मागणी संभाजी जाधव यांनी केली. त्यावेळी प्रभारी आयुक्त देसाई व उपायुक्त विजय खोराटे यांनी बिले थांबविण्याची ग्वाही दिली.
अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीवर सभागृहात चर्चा झाली. प्रशासन जाणीवपूर्वक पदोन्नती डावलत आहे. यामागे कोणाचा अहंकार नडला आहे का, अशी विचारणा राजू लाटकर यांनी केली. २६ वर्षे पदोन्नतीपासून कर्मचारी वंचित राहत असतील ती प्रशासनाची चूक असल्याचे लाटकर म्हणाले. प्रशासनातील एक टोळके विद्वत्ता असलेल्यांना पुढे जाऊ देत नाही, असा टोला भूपाल शेटे यांनी हाणला.
शिवाजी पेठेतील रस्ता महापालिका करणार
रंकाळा टॉवर ते खर्डेकर रुग्णालय व पुढे इराणी खाणीपर्यंतचा रस्ता आयआरबीने करायचा होता. त्यांनी तो न केल्यामुळे हा रस्ता आता महापालिका स्वनिधीतून करणार आहे. तसा निर्णय सभेत घेण्यात आला. रस्ता खर्डेकर रुग्णालयापर्यंतच करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते; मात्र त्याला जोरदार हरकत घेत शारंगधर देशमुख यांनी तो इराणी खाणीपर्यंत करण्याचा आग्रह धरला. (प्रतिनिधी)