शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

नक्षलवाद्यांशी लढण्याच्या धोरणाचा फेरआढावा घेणार

By admin | Updated: April 26, 2017 01:08 IST

नक्षलवाद्यांशी लढण्याच्या धोरणाचा सरकार फेरआढावा घेईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी येथे म्हटले.

रायपूर (छत्तीसगढ) : नक्षलवाद्यांशी लढण्याच्या धोरणाचा सरकार फेरआढावा घेईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी येथे म्हटले. नक्षलवाद्यांचा हिंसाचार समूळ नष्ट करण्याचे मार्ग शोधण्यासाठी नक्षलग्रस्त राज्यांची बैठक ८ मे रोजी घेतली जाईल, असे सिंह यांनी सांगितले. छत्तीसगढ राज्यात सुकमा जिल्ह्यात सोमवारी सुमारे ३०० नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २५ जवानांना छुपा हल्ला करून ठार मारले. सिंह या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे आले होते. राजनाथसिंह वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, आम्ही धोरणाचा फेरआढावा घेऊ व गरज भासल्यास त्याचा पुन: विचार करू. नक्षलवाद्यांचा हिंसाचार समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही काम करीत आहेत यावर त्यांनी भर दिला. हा हल्ला अतिशय शांतपणे विचार करून केलेला खून आहे, भ्याड आणि निराश होऊन केलेले कृत्य असल्याचे सिंह म्हणाले. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. हे नक्षलवादी गट विकासाच्या विरोधात असून, राज्यातील विकासाला ते अस्थिर करू पाहत आहेत, असे राजनाथसिंह म्हणाले. नक्षलवादी आदिवासींचा वापर मानवी ढाल म्हणून करीत आहेत. आमच्या शूर जवानांचे बलिदान वाया जाणार नाही, बस्तरमधील रस्त्यांच्या विकासकामांमुळे नक्षलवादी निराश झाले आहेत; परंतु ते त्यांच्या वाईट विचारांत कधीही यशस्वी होणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.