शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे पथक घेणार पोषण आहाराचा आढावा

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

जिल्हा परिषद : २ ते १० फेब्रुवारी दरम्यान तपासणी नागपूर : शालेय विद्यार्थ्यांची उपासमार थांबावी, शाळेतील उपस्थिती वाढावी या हेतूने शासनामार्फत विद्यार्थ्याना पोषण आहार पुरविला जातो. या योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे पथक २ ते १० फेबु्रवारी दरम्यान नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ...


जिल्हा परिषद : २ ते १० फेब्रुवारी दरम्यान तपासणी
नागपूर : शालेय विद्यार्थ्यांची उपासमार थांबावी, शाळेतील उपस्थिती वाढावी या हेतूने शासनामार्फत विद्यार्थ्याना पोषण आहार पुरविला जातो. या योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे पथक २ ते १० फेबु्रवारी दरम्यान नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते ५वी पर्यंतच्या २,६७० शाळांतील २ लाख ४६ हजार १४६ तर इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंच्या १,३७५ शाळांतील १ लाख ८९ हजार ९९ विद्यार्थ्यांना या योजनेला लाभ दिला जातो. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून ही योजना राबविली जाते. यात केंद्र शासनाचा ७५ तर राज्य शासनाचा २५ टक्के वाटा आहे.
पोषण आहारातून विद्यार्थ्यांना आवश्यक उष्मांक व प्रोटिन्स मिळणे अपेक्षित आहे. यासाठी आठवड्याचे मेनूकार्ड निश्चित करण्यात आलेले आहे. आठवड्यातून एक दिवस पूरक पोषण आहार द्यावयाचा आहे. यात फळे, बिस्किट यांचा समावेश असतो. यासाठी शाळा स्तरावर समिती गठित करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील ३०० महिला बचतगटांच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. ही योजना प्रभावीपणे राबविली जावी. यात लोकसहभाग असावा असे सरकारला अभिप्रेत आहे. यासाठी गेल्या २ वर्षातील रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे. त्रुटी आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
चौकट ....
पथक पुढील बाबी तपासणार
पटसंख्येनुसार आहार शिजवला जातो की नाही.
तांदूळ शिल्लक राहतो का, असल्यास का राहतो.
रेकॉर्डनुसार उपलब्ध तांदूळ आहे की नाही.
धान्य ठेवण्याची जागा सुरक्षित आहे की नाही.
किचनशेडची सुविधा, मेनूतील विविधता
खर्चाचा हिशेब योग्य आहे की नाही.
पोषण आहार समितीच्या बैठका होतात की नाही.
चौकट..........
योजनेतील त्रुटी.......
-सरकारकडून निधी मिळण्याला विलंब
-अपुरा निधी व निकृष्ट धान्याचा पुरवठा
-किचनशेडचा अभाव
-लोकसभहभागाचा अभाव
चौकट...........
जिल्हा अधीक्षकांचा दुजोरा
पोषण आहार योजनेचा आढावा घेण्यासाठी २ ते १० फेब्रुवारी दरम्यान केंद्र सरकारचे १० ते १२ जणांचे पथक येत असल्याला शालेय पोषण आहार योजनेचे जिल्हा अधीक्षक नीलेश वाघमारे यांनी दुजोरा दिला आहे.
.........................