शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

‘रिव्हर्स दांडी यात्रा’ तूर्त मंगळवारपर्यंत रद्द

By admin | Updated: September 14, 2015 01:46 IST

गुजरात सरकार आणि राज्यातील पाटीदार अर्थात पटेल समाजात गत ७० दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष मावळण्याची चिन्हे आहेत

अहमदाबाद : गुजरात सरकार आणि राज्यातील पाटीदार अर्थात पटेल समाजात गत ७० दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष मावळण्याची चिन्हे आहेत. ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडणारे पाटीदार अनामत आंदोलन समितीचे संयोजक हार्दिक पटेल यांनी नियोजित ‘रिव्हर्स दांडी यात्रा’ मंगळवारपर्यंत (१५ सप्टेंबर) रद्द करण्याची घोषणा केली आहे. यानंतर सोमवारी हार्दिक पटेल मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना भेटणार आहेत.गुजरातचे अर्थमंत्री आणि सरकारचे प्रवक्ते सौरभ पटेल यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर मध्यस्थी करीत हार्दिक पटेल आणि मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ‘रिव्हर्स दांडी यात्रा’ मंगळवारपर्यंत रद्द करण्यात आली आहे. सरकारने चर्चेची तयारी दाखविल्याने सोमवारी हार्दिक पटेल आनंदीबेन यांना भेटणार आहेत.रविवारी सकाळी दांडी ते अहमदाबाद अशी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली ‘रिव्हर्स दांडी यात्रा’ निघणार होती. या यात्रेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनास बाहेरच्या राज्यांतूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली होती. या पार्श्वभूमीवर सूत्रे हलली आणि सौरभ पटेल यांच्या मध्यस्थीनंतर चर्चेवर एकमत झाले. खुद्द सौरभ पटेल यांनीच याबाबत माहिती दिली. हार्दिक पटेल सोमवारी मुख्यमंत्री आनंदीबेन यांना भेटण्यास राजी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)