शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

निकाल निराशाजनक पण अनपेक्षित नव्हे - दिग्विजय सिंहांचा काँग्रेसला घरचा आहेर

By admin | Updated: May 20, 2016 12:17 IST

आसाम व केरळसह इतर राज्यांत काँग्रेसची झालेल्या घसरणीचा निकाल निराशाजनक असला तरी अनपेक्षित नव्हता अशा शब्दांत दिग्विजय सिंह यांनी टीका केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - पुद्दुचेरीतील विजय वगळता आसाम व केरळ या राज्यातील सत्ता गमावणे आणि पश्चिम बंगाल व तामिळनाडूतही मतदारांनी दूर लोटल्याने काँग्रेस उतरणीचा काळ सूर झाल्याची चर्चा सुरू आहे. या पराभवानंतर विरोधकांनी काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवलेला असतानाच आता स्वपक्षीयांनीही याप्रकरणी आपली मते स्पष्ट मते मांडण्यास सुरूवात केली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही 'पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील निकाल निराशाजनक असला तरी अनपेक्षित नक्कीच नव्हता' असे म्हणत नाराजी दर्शवली आहे. 
दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून आपली मते स्पष्टपणे मांडत पक्षाने  पराभवापासून धडा घेऊन ठोस कृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
' आजचे (आसाम व केरळमधील) निकाल हे निराशाजनक असले तरी अनपेक्षित नव्हते. आपण बराच काळ पराभवाचे परीक्षण केले आहे, आता (पक्षाने) ठोस कारवाई करण्याची गरज आहे' असे ट्विट त्यांनी केले आहे. आम्ही सर्वजण आता कृतीची वाट पाहात आहोत, असेही त्यांनी म्हटले.
 
कालच्या निकालानंतर काँग्रेसने आसाम व केरळमधील सत्ताही गमावली असून सध्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, पुद्दूचेरी, मेघालय, मिझोराम आणि मणिपूर या फक्त सात राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.  लोकसभा निवडणुकापासून सुरू झालेली काँग्रेसची घसरगुंडी कायम असून अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होईल.