शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपन्यांवर बंधने

By admin | Updated: June 12, 2016 03:51 IST

विमानांची तिकिटे रद्द केल्यास लावल्या जाणाऱ्या शुल्कावर मर्यादा घालण्याचा, तसेच विमानात प्रवेश करण्यास परवानगी नाकारल्यास अधिक भरपाई देण्याचा आणि अतिरिक्त सामान असल्यास

नवी दिल्ली : विमानांची तिकिटे रद्द केल्यास लावल्या जाणाऱ्या शुल्कावर मर्यादा घालण्याचा, तसेच विमानात प्रवेश करण्यास परवानगी नाकारल्यास अधिक भरपाई देण्याचा आणि अतिरिक्त सामान असल्यास विमान कंपन्यांद्वारे आकारले जाणारे शुल्क घटविण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मंत्रालयाने प्रवाशांचे हित ध्यानात घेऊन अनेक प्रस्ताव मांडले आहेत. त्यात या प्रस्तावांचा समावेश आहे. एखादे विमान रद्द झाल्यास प्रवाशांना सर्व कायदेशीर करही द्यावे लागतील, असा एक प्रस्ताव आहे. नागरी उड्डयन महासंचालनालयाने याबाबत प्रस्ताव तयार केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत तिकीट रद्द करण्यावरील लागणारे शुल्क मूळ तिकिटापेक्षा जास्त राहणार नाही. त्याचबरोबर भाडे परत करताना कंपन्या अतिरिक्त शुल्क घेऊ शकणार नाहीत.‘चेक्ड इन बॅगेज’च्या संबंधात विमान कंपन्या १५ किलो सामानाच्या मर्यादेपेक्षा जास्त वजनाचे सामान झाल्यास २० किलोपर्यंत प्रतिकिलो १०० रुपये शुल्क आकारतील. सध्या १५ किलोपेक्षा अधिक सामान झाल्यास प्रतिकिलो ३०० रुपये शुल्क आकारले जाते. केवळ एअर इंडियात २३ किलोपर्यंत सामान नि:शुल्क नेण्याची परवानगी आहे. विमानात क्षमतेपेक्षा जास्त बुकिंग झाल्यास व त्या स्थितीत प्रवाशाला प्रवासापासून वंचित ठेवल्यास, ठरलेल्या अटीनुसार २० हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचा प्रस्ताव आहे. आपल्या अडचणी योग्य त्या वेळेत सोडविण्यात आल्या नाहीत, अशा तक्रारी वाढल्यामुळे हे नवीन प्रस्ताव मांडण्यात आल्याचे नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले. नवीन उपाय आणण्यासाठी डीजीसीएने तीन नागरी उड्डयन गरजा आणि एक हवाई प्रवास सर्क्युलरमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर अंतिम निर्णय घेतल्यानंतर, तो सार्वजनिक चर्चेसाठी ठेवला जाणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)