शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अभिमतला उरलेले प्रवेश स्वत: देण्यास मनाई

By admin | Updated: September 29, 2016 06:18 IST

महाराष्ट्रातील अभिमत विद्यापीठांनी स्वत: समुपदेशन करून एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांसाठी यंदा आतापर्यंत दिलेले प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले असले

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अभिमत विद्यापीठांनी स्वत: समुपदेशन करून एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांसाठी यंदा आतापर्यंत दिलेले प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले असले तरी शिल्लक असलेल्या जागांचे प्रवेश विद्यापीठे आणि राज्य सरकार यांनी संयुक्त समुपदेशन करून दिले जावेत, असा आदेश दिला आहे.राज्यातील वैद्यकीय व दंतवैद्यक पदवी अभ्यासक्रमांचे सरकारी, खासगी व अभिमत विद्यापीठांमधील प्रवेश ‘नीट’च्या गुणवत्ता यादीनुसार राज्य सरकारच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून समुपदेशन करून दिले जातील, असा आदेश केंद्र सरकारने ९ आॅगस्ट रोजी व राज्य सरकारने २० आॅगस्ट रोजी दिला होता. याविरुद्ध अभिमत विद्यापीठे उच्च न्यायालयात गेली तेव्हा न्यायालयाने त्याला अंतरिम स्थगिती दिली.या अंतरिम स्थगितीविरुद्ध राज्य व केंद्र सरकारने केलेल्या अपिलांवर बुधवारी न्यायालयात न्या. ए. के. सिक्री व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली तेव्हा, दरम्यान या विद्यापीठांनी बव्हंशी प्रवेश काउन्सिलिंग करून दिले आहेत व प्रवेशांसाठी ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याने झालेले प्रवेश रद्द केले तर ते मुदतीत पूर्ण करणे शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन न्यायालयाने वरील आदेश दिला.आता अभिमत विद्यापीठांमधील एमबीबीएस व बीडीएस प्रवेशांसाठीच्या समुपदेशनाची दुसरी व तिसरी फेरी एका समितीकडून पार पाडली जाईल. या समितीवर राज्य सरकार व प्रत्येक अभिमत विद्यापीठाचा एक प्रतिनिधी असेल. हे समुपदेशन प्रत्येक अभिमत विद्यापीठांसाठी स्वतंत्र नव्हे तर सर्व अभिमत विद्यापीठांसाठी एकत्रितपणे होईल.समितीमार्फत होणाऱ्या या समुपदेशनासाठी ज्यांनी राज्य सरकारकडे व ज्यांनी निरनिराळ्या अभिमत विद्यापीठांकडे नावे नोंदविली आहेत अशा विद्यार्थ्यांची ‘नीट’ गुणवत्तेनुसार यादी तयार केली जाईल. यामुळे राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, आधी झालेल्या प्रवेशांमध्ये अधिक गुणवत्ता असूनही ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या अभिमत विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही त्यांना ते मिळतील. यामुळे विद्यार्थ्यांना या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यात खरेच स्वारस्य आहे, हेही स्पष्ट होईल, असे न्यायालयाने म्हटले.संयुक्त समुपदेशनासाठी सर्व अभिमत विद्यापीठांनी प्रवेशांसंबंधीचे सर्व रेकॉर्ड ताबडतोब राज्य सरकारकडे सुपुर्द करावे व सरकार आणि विद्यापीठांनी एकही जागा शिल्लक न राहता सर्व प्रवेश पूर्ण होतील, याची खात्री करावी. ही प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे शक्य होईल असे दिसत नसल्याने या प्रवेशांसाठी न्यायालयाने अंतिम मुदत ७ आॅक्टोबरपर्यंत वाढवून दिली. या सुनावणीत राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी, केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी तर अभिमत विद्यापीठांसाठी पी. चिदंबरम व डॉ. अभिषेक मनू सिंघवी या ज्येष्ठ वकिलांनी काम पाहिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)ही व्यवस्था यंदापुरतीही व्यवस्था फक्त यंदाच्या वर्षापुरती केली गेली आहे. ‘नीट’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल पाहता अभिमत विद्यापीठे स्वत:चे प्रवेश स्वत: करू शकतात का कळीचा मुद्दा असून त्याचा निकाल उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांमध्ये होईल व पुढील वर्षांनंतरचे प्रवेश त्यानुसार होतील. या याचिका उच्च न्यायालयात उद्या २९ सप्टेंबर रोजी यायच्या आहेत. उच्च न्यायालयाने रोजच्या रोज सुनावणी घेऊन या याचिका लवकरात लवकर निकाली काढाव्यात, असेही खंडपीठाने सुचविले.