स्मार्ट सिटी परिसंवाद पदाधिकार्यांच्या प्रतिक्रिया
By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST
दत्तात्रय धनकवडे (महापौर) - स्मार्ट सिटी आराखडयाबाबत सर्वच पक्षांनी सकारात्मक भुमिका ठेवली पाहिजे. पुणेकरांना त्याबाबत काय वाटते या भावनांचा आदर केला पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. स्मार्ट सिटी आराखडयामध्ये आम्ही सुधारणा सुचविणार आहोत. स्मार्ट सिटीसाठी स्थापन होणार्या कंपनीने चांगले काम करणे अपेक्षित आहे, ते केवळ कर्ज काढून ठेवणार ...
स्मार्ट सिटी परिसंवाद पदाधिकार्यांच्या प्रतिक्रिया
दत्तात्रय धनकवडे (महापौर) - स्मार्ट सिटी आराखडयाबाबत सर्वच पक्षांनी सकारात्मक भुमिका ठेवली पाहिजे. पुणेकरांना त्याबाबत काय वाटते या भावनांचा आदर केला पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. स्मार्ट सिटी आराखडयामध्ये आम्ही सुधारणा सुचविणार आहोत. स्मार्ट सिटीसाठी स्थापन होणार्या कंपनीने चांगले काम करणे अपेक्षित आहे, ते केवळ कर्ज काढून ठेवणार असतील तर ते चालणार नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा टाकता कामा नयेत. स्मार्ट सिटीसाठी सर्वच पक्षांनी राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र आले पाहिजे..............ॲड. अभय छाजेड (शहराध्यक्ष, काँग्रेस) - स्मार्ट हा शब्द चांगला आहे, याअंतर्गत शहर सुंदर होणार असल्याचे स्वप्न दाखविण्यात आले आहे. स्मार्ट सिटी आराखडयामध्ये सर्वात आक्षेपार्ह मुदद हा स्पेशल पर्पज व्हेईकलचा (एसपीव्ही) आहे. एसपीव्ही ही घटनेशी सुसंगत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटीचे एसपीव्ही मॉडेल स्वीकारले तर महापालिकेच्या आणखी वेगवेगळया सुविधांसाठी एसपीव्ही उभारण्याचे प्रस्ताव पुढे येतील. पीएमपीएलची कंपनी स्थापन झाली त्याचा अनुभव काय आहे याचाही यानिमित्तने विचार करावा लागेल. पुण्यापेक्षा मोठी असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये अधिकारांचे चांगल्या पध्दतीने विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे, तसे पुणे महापालिकेचेही सक्षमीकरण झाले पाहिजे..............रूपाली पाटील (अध्यक्ष, शहर सुधारणा समिती) - स्मार्ट सिटी आराखडयासाठी डोळे झाकून मान्यता दिली असता लोकांनी त्याचा आम्हांला जाब विचारला असता. स्मार्ट सिटी आराखडयामधील एसपीव्ही ही केवळ नगरसेवकांचीच नाही तर घटनेच्या हक्काचीही पायमल्ली आहे. भाजपची महापालिकेमध्ये सत्ता येईल की नाही माहिती नाही मात्र एसपीव्हीच्या माध्यमातून शहरावर वरदहस्त ठेवण्यासाठी केंद्राकडून हा प्रस्ताव मांडला जात आहे. आयुक्त हे एका पक्षाचा अजेंडा मांडत आहेत, त्यांना प्रमोशनवर जायचे आहे म्हणून ते यासाठी झटत आहेत. स्मार्ट सिटी करण्यासाठी पुणे शहरच का हवे, इतर शहरांचा ते का विचार करीत नाहीत.............