शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशबांधवांची शहिदांना आदरांजली

By admin | Updated: July 26, 2015 23:37 IST

कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना कारगिल विजय दिनानिमित्त समस्त देशबांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशभरात

नवी दिल्ली : कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना कारगिल विजय दिनानिमित्त समस्त देशबांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहिदांचे स्मरण करण्यात आले. दिल्लीतील अमर ज्योती जवान स्मारकावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह सशस्त्र दलाच्या तीनही प्रमुखांनी पुष्पांजली अर्पण करून शहिदांच्या स्मृतीस मानवंदना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कारगिल विजय दिनानिमित्त १९९९ च्या कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या माझ्या वीर जवानांना मी शतश: नमन करतो, असे ते म्हणाले. या युद्धात भारतीय सशस्त्र दलाचे ४९० अधिकारी व जवान शहीद झाले होते.आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले. आपल्या देशाच्या इतिहासात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून नोंदवला गेला आहे. कारगिल युद्धात आपला एक एक जवान शंभर शंभर शत्रूंना भारी पडला. प्राणांची पर्वा न करता त्यांनी शत्रूला धूळ चारली. देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या माझ्या देशाच्या वीर जवानांना मी शतश: नमन करतो, असे मोदी यावेळी म्हणाले. कारगिल युद्ध केवळ सीमेवर नाही, तर भारताच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात लढले गेले. प्रत्येक भारतीयाचे यात योगदान होते. शत्रूसोबत प्रत्यक्ष लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांनीही हे युद्ध लढले, असेही ते म्हणाले.संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग, हवाईदल प्रमुख मार्शल अरूप शहा आणि नौदल उपप्रमुख पी. मुरुगेसन यांनी दिल्लीतील अमर जवान ज्योती या स्मृतिस्थळावर कारगिल शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)