शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

देशबांधवांची शहिदांना आदरांजली

By admin | Updated: July 26, 2015 23:37 IST

कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना कारगिल विजय दिनानिमित्त समस्त देशबांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशभरात

नवी दिल्ली : कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना कारगिल विजय दिनानिमित्त समस्त देशबांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहिदांचे स्मरण करण्यात आले. दिल्लीतील अमर ज्योती जवान स्मारकावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह सशस्त्र दलाच्या तीनही प्रमुखांनी पुष्पांजली अर्पण करून शहिदांच्या स्मृतीस मानवंदना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कारगिल विजय दिनानिमित्त १९९९ च्या कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या माझ्या वीर जवानांना मी शतश: नमन करतो, असे ते म्हणाले. या युद्धात भारतीय सशस्त्र दलाचे ४९० अधिकारी व जवान शहीद झाले होते.आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले. आपल्या देशाच्या इतिहासात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून नोंदवला गेला आहे. कारगिल युद्धात आपला एक एक जवान शंभर शंभर शत्रूंना भारी पडला. प्राणांची पर्वा न करता त्यांनी शत्रूला धूळ चारली. देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या माझ्या देशाच्या वीर जवानांना मी शतश: नमन करतो, असे मोदी यावेळी म्हणाले. कारगिल युद्ध केवळ सीमेवर नाही, तर भारताच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात लढले गेले. प्रत्येक भारतीयाचे यात योगदान होते. शत्रूसोबत प्रत्यक्ष लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांनीही हे युद्ध लढले, असेही ते म्हणाले.संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग, हवाईदल प्रमुख मार्शल अरूप शहा आणि नौदल उपप्रमुख पी. मुरुगेसन यांनी दिल्लीतील अमर जवान ज्योती या स्मृतिस्थळावर कारगिल शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)