शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

देशबांधवांची शहिदांना आदरांजली

By admin | Updated: July 26, 2015 23:37 IST

कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना कारगिल विजय दिनानिमित्त समस्त देशबांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशभरात

नवी दिल्ली : कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना कारगिल विजय दिनानिमित्त समस्त देशबांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहिदांचे स्मरण करण्यात आले. दिल्लीतील अमर ज्योती जवान स्मारकावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह सशस्त्र दलाच्या तीनही प्रमुखांनी पुष्पांजली अर्पण करून शहिदांच्या स्मृतीस मानवंदना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कारगिल विजय दिनानिमित्त १९९९ च्या कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या माझ्या वीर जवानांना मी शतश: नमन करतो, असे ते म्हणाले. या युद्धात भारतीय सशस्त्र दलाचे ४९० अधिकारी व जवान शहीद झाले होते.आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले. आपल्या देशाच्या इतिहासात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून नोंदवला गेला आहे. कारगिल युद्धात आपला एक एक जवान शंभर शंभर शत्रूंना भारी पडला. प्राणांची पर्वा न करता त्यांनी शत्रूला धूळ चारली. देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या माझ्या देशाच्या वीर जवानांना मी शतश: नमन करतो, असे मोदी यावेळी म्हणाले. कारगिल युद्ध केवळ सीमेवर नाही, तर भारताच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात लढले गेले. प्रत्येक भारतीयाचे यात योगदान होते. शत्रूसोबत प्रत्यक्ष लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांनीही हे युद्ध लढले, असेही ते म्हणाले.संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग, हवाईदल प्रमुख मार्शल अरूप शहा आणि नौदल उपप्रमुख पी. मुरुगेसन यांनी दिल्लीतील अमर जवान ज्योती या स्मृतिस्थळावर कारगिल शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)