शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार्‍यांच्या नकारघंटेवर उपसभापतींचा संताप

By admin | Updated: April 5, 2016 22:02 IST

जळगाव- केळीचे जे भाव बोर्डावर असतील तेवढाच भाव शेतकर्‍यांना द्यावा लागेल... यापेक्षा कमी भाव दिला तर दंड होईल... केळीची मोजणी इलेक्ट्रॉनिक काट्यावर करावी लागेल... व बाजार समितीच्या परवान्याशिवाय कुणालाही व्यवसाय करता येणार नाही... तसे केल्यास जागेवरच १० हजार रुपये दंड व वाहन जप्त होईल..., अशा निर्णयांना केळी व्यापार्‍यांनी विरोध केला. हे नियम किंवा निर्णय मान्य नसतील तर व्यापार्‍यांनी आपले परवाने बाजार समितीकडे परत करावेत.. आणि व्यापार थांबवावा, असा संताप उपसभापती कैलास चौधरींनी बैठकीत केला. पण व्यापारी मानत नसल्याने संचालक व व्यापारी यांच्यातही वादंग झाला...

जळगाव- केळीचे जे भाव बोर्डावर असतील तेवढाच भाव शेतकर्‍यांना द्यावा लागेल... यापेक्षा कमी भाव दिला तर दंड होईल... केळीची मोजणी इलेक्ट्रॉनिक काट्यावर करावी लागेल... व बाजार समितीच्या परवान्याशिवाय कुणालाही व्यवसाय करता येणार नाही... तसे केल्यास जागेवरच १० हजार रुपये दंड व वाहन जप्त होईल..., अशा निर्णयांना केळी व्यापार्‍यांनी विरोध केला. हे नियम किंवा निर्णय मान्य नसतील तर व्यापार्‍यांनी आपले परवाने बाजार समितीकडे परत करावेत.. आणि व्यापार थांबवावा, असा संताप उपसभापती कैलास चौधरींनी बैठकीत केला. पण व्यापारी मानत नसल्याने संचालक व व्यापारी यांच्यातही वादंग झाला...

मंगळवारी केळीचे भाव, केळी खरेदी, बोर्डावरील भावांच्या तुलनेत कमी भाव देणे अशा मुद्द्यांवर बाजार समितीमध्ये केळी व्यापार्‍यांसोबत बैठकीचे आयोजन दुपारी करण्यात आले. बैठकीत सुमारे तासभर बैठकीत चर्चा झाली. पण अनेक निर्णयांना प्रमुख केळी व्यापार्‍यांनी विरोध केल्याने बैठकीत शाब्दीक वाद झाले. शेवटी काही व्यापार्‍यांनी नमते घेतले.
निम्मेपेक्षा अधिक संचालकांची दांडी
केळीचा मुद्दा चर्चेत आहे. शेतकर्‍यांसाठी तो संवेदनशील आहे. असे असताना बैठकीला फक्त सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी, संचालक प्रभाकर पवार, सिंधूबाई पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. अर्थातच निम्मेपेक्षा अधिक संचालकांनी या बैठकीला दांडी मारली.

या निर्णयांना विरोध
विनापरवाना केळी खरेदी केल्यास संबंधित व्यापार्‍याला १० हजार रुपये दंड केला जाईल, केळीची खरेदी करताना मोजमाप इलेक्ट्रॉनिक काट्यावरच करावी लागेल या निर्णयांना व्यापार्‍यांनी विरोध केला. याच मुद्द्यावरून उपसभापती चौधरी व रऊफ शेठ कंपनीच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला. हा निर्णय मान्य नसेल त्यांनी बैठकीत स्पष्ट करावे... आपला परवाना बाजार समितीकडे परत करून आपला व्यवसाय थांबवावा, असा संताप चौधरींनी व्यक्त केला. सभापती नारखेडे व इतर संचालकांनी हा वाद मिटविला.

बोर्डाप्रमाणे खरेदी का करीत नाही?
केळीचा भाव ६०० रुपये असला तर व्यापारी आखूड केळी, मंदी अशी कारणे सांगून २०० रुपये क्विंटलमागे कमी देतात. शेतकर्‍यांचे कंबरडे मोडण्याचे काम व्यापार्‍यांनी मागील दोन वर्षे केले, असा दावा संचालकांनी केला.

कांदेबागाचे भाव जळगावहून असावेत
रावेरात कांदेबागाचे क्षेत्र मोजके आहे. जळगाव व चोपडा तालुक्यात कांदेबागाचे क्षेत्र अधिक असते. यामुळे जळगाव बाजार समितीने कांदेबागाचे भाव काढावेत, असामुद्दाउपसभापतीचौधरीयांनीलोकमतशीबोलतानामांडला.