शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

रिझर्व्ह बँकेला नकाराधिकार हवाच

By admin | Updated: September 4, 2016 01:01 IST

रिझर्व्ह बँकेला सरकारने तयार केलेल्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. ही बँक सर्व बंधनांपासून मुक्त नाही, हे खरे असले तरी स्थूल अर्थव्यवस्था अबाधित राखण्यासाठी

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेला सरकारने तयार केलेल्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. ही बँक सर्व बंधनांपासून मुक्त नाही, हे खरे असले तरी स्थूल अर्थव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सरकारमधील वरिष्ठ पातळीवरील व्यक्तींनाही प्रसंगी ‘नाही’ म्हणण्याची रिझर्व्ह बँकेची क्षमता अबाधित राहायला हवी, असे आग्रही प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांनी शनिवारी येथे केले.तीन वर्षांची कारकीर्द संपवून रविवारी निवृत्त होण्याआधी येथील सेंट स्टिफन्स कॉलेजमध्ये डॉ.राजन यांचे ‘केंद्रीय बँकेचे स्वातंत्र्य’ या विषयावर शेवटचे जाहीर भाषण झाले. डॉ. राजन पुन्हा अध्ययन व अध्यापनाकडे वळणार आहेत. शक्तिशाली पद निम्न हुद्यावर ठेवणे धोकादायक होऊ शकते, असे सांगून त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा हुद्दा वाढविण्याचाही आग्रह धरला. (लोकमत न्यूज नेटवर्क)केंद्रीय बँकेला केंद्र व राज्य सरकारांच्या वरिष्ठ पातळीविरुद्ध वेळोवेळी जोरकसपणे बाजू लावून धरावी लागते. या संदर्भात माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांच्या विधानांना उजाळा दिला. रिझर्व्ह बँक बळकटच हवीभारतासाठी बृहत् आर्थिक स्थैर्य खूप महत्त्वाचे आहे आणि याबाबत समस्या निर्माण झाल्यास ती दूर करता यावी यासाठी या बँकेकडे स्रोत, ज्ञान आणि कुशल मनुष्यबळ असायला हवे. बृहत् आर्थिक स्थैर्यासाठी भारताला बळकट आणि स्वतंत्र रिझर्व्ह बँकेची गरज आहे. रिझर्व्ह बँकेच्या जबाबदाऱ्यांबाबत अस्पष्टता असेल तर तिच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहील, असेही डॉ. राजन म्हणाले.मंडळाने निगराणीची भूमिका बजवावीसरकारद्वारे नियुक्त रिझर्व्ह बँक मंडळाने निगराणीची भूमिका बजवायला हवी. कारण, या मंडळात माजी अधिकारी, सरकारी अधिकारी आणि सरकारने नियुक्त केलेले लोक असतात. अर्थसंकल्प, परवाना, नियमन आणि निरीक्षण या मुद्यांशी संबंधित रिझर्व्ह बँकेच्या सर्व महत्त्वपूर्ण निर्णयांना एकतर या मंडळाकडून मंजुरी दिली गेली पाहिजे किंवा त्याच्या एखाद्या उपसमितीने हे काम पाहायला हवे.