शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

रिझर्व्ह बँकेला नकाराधिकार हवाच

By admin | Updated: September 4, 2016 01:01 IST

रिझर्व्ह बँकेला सरकारने तयार केलेल्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. ही बँक सर्व बंधनांपासून मुक्त नाही, हे खरे असले तरी स्थूल अर्थव्यवस्था अबाधित राखण्यासाठी

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेला सरकारने तयार केलेल्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. ही बँक सर्व बंधनांपासून मुक्त नाही, हे खरे असले तरी स्थूल अर्थव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सरकारमधील वरिष्ठ पातळीवरील व्यक्तींनाही प्रसंगी ‘नाही’ म्हणण्याची रिझर्व्ह बँकेची क्षमता अबाधित राहायला हवी, असे आग्रही प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांनी शनिवारी येथे केले.तीन वर्षांची कारकीर्द संपवून रविवारी निवृत्त होण्याआधी येथील सेंट स्टिफन्स कॉलेजमध्ये डॉ.राजन यांचे ‘केंद्रीय बँकेचे स्वातंत्र्य’ या विषयावर शेवटचे जाहीर भाषण झाले. डॉ. राजन पुन्हा अध्ययन व अध्यापनाकडे वळणार आहेत. शक्तिशाली पद निम्न हुद्यावर ठेवणे धोकादायक होऊ शकते, असे सांगून त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा हुद्दा वाढविण्याचाही आग्रह धरला. (लोकमत न्यूज नेटवर्क)केंद्रीय बँकेला केंद्र व राज्य सरकारांच्या वरिष्ठ पातळीविरुद्ध वेळोवेळी जोरकसपणे बाजू लावून धरावी लागते. या संदर्भात माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांच्या विधानांना उजाळा दिला. रिझर्व्ह बँक बळकटच हवीभारतासाठी बृहत् आर्थिक स्थैर्य खूप महत्त्वाचे आहे आणि याबाबत समस्या निर्माण झाल्यास ती दूर करता यावी यासाठी या बँकेकडे स्रोत, ज्ञान आणि कुशल मनुष्यबळ असायला हवे. बृहत् आर्थिक स्थैर्यासाठी भारताला बळकट आणि स्वतंत्र रिझर्व्ह बँकेची गरज आहे. रिझर्व्ह बँकेच्या जबाबदाऱ्यांबाबत अस्पष्टता असेल तर तिच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहील, असेही डॉ. राजन म्हणाले.मंडळाने निगराणीची भूमिका बजवावीसरकारद्वारे नियुक्त रिझर्व्ह बँक मंडळाने निगराणीची भूमिका बजवायला हवी. कारण, या मंडळात माजी अधिकारी, सरकारी अधिकारी आणि सरकारने नियुक्त केलेले लोक असतात. अर्थसंकल्प, परवाना, नियमन आणि निरीक्षण या मुद्यांशी संबंधित रिझर्व्ह बँकेच्या सर्व महत्त्वपूर्ण निर्णयांना एकतर या मंडळाकडून मंजुरी दिली गेली पाहिजे किंवा त्याच्या एखाद्या उपसमितीने हे काम पाहायला हवे.