शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

राजस्थानमध्ये आरक्षण ६८ टक्क्यांवर

By admin | Updated: September 23, 2015 15:24 IST

राजस्थान सरकारने मंगळवारी दोन विधेयक मंजूर करत ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादा ओलांडत ते ६८ टक्क्यांवर नेले आहे.

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. २३ -  पाटीदार पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून हार्दिक पटेलने गुजरात वेठीस धरलेले असताना आणि आरक्षणाचा पुनर्विचार करण्याबद्दल सरसंघचालक मोहन भागवतांनी केलेल्या विधानामुळे संपूर्ण देश ढवळून निघालेला असतानाच राजस्थान सरकारने ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादा ओलांडत ते ६८ टक्क्यांवर नेले आहे. राजस्थान विधानसभेने मंगळवारी आर्थिकदृष्ट्या मागासांना १४ टक्के आरक्षण देणारे व गुज्जरांसह विशेष मागास वर्गीयांना ५ टक्के देणारी दोन विधेयके आवाजी मतदानाने मंजूर केल्याने आता राज्यातील एकूण आरक्षण ६८ टक्के झाले आहे. 
या विधेयकांअतर्गत सवर्णांतील आर्थिकदृष्ट्या मागासांना शैक्षणिक संस्था तसेच नोकरीत १४ टक्के आरक्षण मिळणार असून गुर्जर, बंजारा, गडरिया, रेबारी, गडिया लोहार इत्यादींना विशेष मागास वर्गासाठी पाच टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. 
मात्र  राजस्थान सरकारच्या या नव्या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या ५० टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयानेही २००९ व २०१३ साली ५० हून अधिक आरक्षणास असंवैधानिक म्हटले होते. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.