शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

खासगीसह न्यायपालिकेतही हवे आरक्षण

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

खासगीसह न्यायपालिकेतही हवे आरक्षण

खासगीसह न्यायपालिकेतही हवे आरक्षण
राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा- रामविलास पासवान यांची मागणी
नागपूर -
अनुसूचित जाती-जमातींना खासगी क्षेत्रासह न्यायपालिकेतही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी दलित सेनेचे संस्थापक, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी येथे केली.
दलित सेनेतर्फे शनिवारी दुपारी प्रगती भवन छत्रपती चौक वर्धा रोड येथे राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी दलित सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सूर्यमणी भिवगडे, शमीम हवा, राष्ट्रीय महासचिव अनिल तायडे, प्रदेश अध्यक्ष सुनील यादव, राज फुले, विनोद टिकले, विनायक मोहोड, प्रमोद सहारे व्यासपीठावर हजर होते.
रामविलास पासवान म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आमचे राजकारण आहे. दलित, अल्पसंख्याक हा आमचा परिवार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना आम्ही प्रामुख्याने प्राधान्य देणार आहोत. आरक्षणाच्या मागणीसह दलित-आदिवासींच्या स्पेशल कम्पोनंट प्लॅनची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली. दलितांच्या प्रश्नांसाठी नॅशनल दलित फ्रंट अंतर्गत दिल्लीत एक भव्य रॅली काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दलित, लोजपा, व दलित सेनेच्या सर्व शाखांचे वेगवेगळे मेळावे आयोजित करून पक्षाला मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. विकासाचा मुद्दा लावून धरीत पक्षाला मजबुत करावे व त्यासोबतच आपण एनडीएचे घटक असल्याने एनडीएलासुद्धा मजबूत करा, असे आवाहनसुद्धा पासवान यांनी केले.
सूर्यमणी भिवगडे यांनी दलित सेनेतर्फे येत्या काळात मुस्लीम आरक्षण, शिष्यवृत्ती घोटाळा, एससी-एसटी स्पेशन कम्पोनंट प्लॅनची अंमलबजावणी याविषयावर कालबद्ध आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच यासंबंधीचा ठरावसुद्धा पारित करण्यात आला. शमीम हवा, अनिल तायडे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी ओबीसी आरक्षण संघर्ष समितीसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पासवान यांचे स्वागत करून मागणीचे निवेदन सादर केले. राज फुले यांनी प्रास्ताविक केले. सुनील यादव यांनी संचालन केले.
बॉक्स..
गडकरी विकासाची दृष्टी असलेले नेते
नितीन गडकरी हे विकासाची दृष्टी असलेले देशातील एक ज्येष्ठ नेते आहेत, असे गौरवोद्गार रामविलास पासवान यांनी यावेळी काढले. येत्या बिहारच्या निवडणुकीमध्ये एनडीएचीच सत्ता येणार असून लोजपा हा सर्वात मोठा पक्ष राहील. त्यानंतर महाराष्ट्रावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.