शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण धोक्यात !

By admin | Updated: April 12, 2016 05:23 IST

ज्यांनी आजवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला, तेच आता त्यांच्या नावाचा आधार घेत असून देशातील आदिवासी व दलितांचे आरक्षण धोक्यात आहे, अशा शब्दांत अ.भा. काँग्रेस समितीच्या

सोनिया व राहुल गांधींचा हल्लाबोल : नागपूरच्या सभेत ‘जयभीम’चा नारा नागपूर : ज्यांनी आजवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला, तेच आता त्यांच्या नावाचा आधार घेत असून देशातील आदिवासी व दलितांचे आरक्षण धोक्यात आहे, अशा शब्दांत अ.भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपावर हल्लाबोल केला. या मनुवादी विचारधारेचा काँग्रेस दटून सामना करेल, त्यांच्यासमोर झुकणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. अ.भा. काँग्रेस समितीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्ष सोहळ्याचा समारोप सोमवारी कस्तूरचंद पार्क येथे झाला. या वेळी झालेल्या भरगच्च सभेत सोनिया गांधी व राहुल यांनी भाजपा व संघ परिवारावर जोरदार हल्ला चढविला. दोन्ही नेत्यांनी भाषणाची सुरुवात व शेवट ‘जय भीम’चा जयघोष करीत केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादनही केले. सभेपूर्वी सोनिया व राहुल गांधी यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. तर सभास्थळी येताच त्यांनी दुसऱ्या मंचावर बसलेल्या भिक्खुसंघाजवळ जाऊन त्यांना चिवरदान दिले व आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते उपस्थित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजय सिंह, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या, माजी मंत्री आॅस्कर फर्नांडिस, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, वीरप्पा मोईली, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, राजीव शुक्ला, मोहसिना किडवई, मुनिअप्पा, अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. राजू, कृपाशंकर सिंग, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,नारायण राणे, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, पी.एल. पुनिया, खासदार विजय दर्डा, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) 

संघाचे लोक मंत्र्यांचे ‘ओएसडी’ !देशातील बहुतांश विद्यापीठांमध्ये संघाचेच लोक कुलगुरू म्हणून नियुक्त होत आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात दलित व वंचितांचा शिरकाव होऊ नये, हे त्यांचे कारस्थान आहे. अगदी प्रशासकीय क्षेत्रातदेखील हेच चित्र आहे. संघाचे लोक मंत्र्यांचे ‘ओएसडी’ बनून मंत्रिमंडळ चालवत आहेत. खुद्द भाजपाचेच खासदार अशी खंत व्यक्त करीत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. देशात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, सराफा व्यापारी हवालदिल झाले आहेत, विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. कोणी मरण पावले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीही फरक पडत नाही, संघ सांगेल तेवढेच ते करतात,अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान मोदींवर नेम साधला. कस्तूरचंद पार्क फुल्ल केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना जीवनदायी योजनेच्या लोकार्पणासाठी कस्तूरचंद पार्कवर झालेल्या सोनिया गांधी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. एवढा मोठा जनसमुदाय पाहून काँग्रेस नेत्यांचाही उत्साह वाढला. महिलांना वंचित ठेवण्याचे सरकारचेच कारस्थानकेंद्र शासन संघाच्या इशाऱ्यावर चालत आहे. मोदी हे डॉ. आंबेडकर यांचे प्रशंसक असल्याचा दावा करतात. परंतु त्यांनी वंचितांसाठी असलेल्या विविध योजनांच्या तरतुदींमध्ये कपात केली आहे. वंचितांसाठी काही करायचे नसेल तर मग प्रशंसक असल्याचे ढोंग का? देशात दुफळी माजविण्याचे प्रयत्न सुरू असताना मोदी यांनी मौन साधले आहे हे आश्चर्यजनक आहे, असे सांगत हरियाणा व राजस्थान येथील पंचायच समितीच्या निवडणुकांमध्ये शिक्षणाचे कारण देऊन दलित महिलांना निवडणूक लढण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात मोदी सरकारचेच कारस्थान आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला.मनुवाद आजही कायममनु विचारसरणीमुळे डॉ. आंबेडकर यांना शालेय जीवनात स्पृश्य-अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. त्यामुळेच त्यांनी मनु विचारसरणीच्या विरोधात लढा दिला. परंतु, अजूनही मनुची विचारसरणी देशात कायम असून, त्यातूनच रोहित वेमुलाची हत्या झाली, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.रोहित वेमुला याने अन्यायाविरुद्ध आवाज उठविला; परंतु त्याचा आवाज दाबण्यात आला. त्याने आत्महत्या केली नसून न्याय मिळावा यासाठी बलिदान दिले आहे. मी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा राहिलो. यापुढेदेखील मी त्यांच्यासाठी लढतच राहील, असे राहुल गांधी यांनी सांगितले.