शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अभिरुची बदलल्याने दर्जेदार गीतसंगीत हरविले (भाग ३)

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

आता माझीच गाणी मला आठवत नाहीत

आता माझीच गाणी मला आठवत नाहीत
वेगवेगळ्या भाषांत मी आतापर्यंत अनेक गीते ऐकली. माझेच गीत मी ऐकले तर मलाही आता आठवत नाही. सध्याची नवीन गायकांची गीते ऐकायला मात्र मला वेळ मिळत नाही. ती गीते ऐकण्यासारखी आहेत असे मला वाटत नाही. सारेच नवे गायक वाईट नाहीत पण मला सारेच आवडत नाहीत. पूर्वी सिनेमातील सर्वच गीते लोकप्रिय व्हायची. आता एखादेच लोकप्रिय होते. काही वेळेला मी गायिलेली गीते चांगली असतानाही सिनेमा चालला नाही म्हणून गीते लोकप्रिय झाली नाहीत, असेही झाले आहे. तर काही वेळेला गीत लोकप्रिय झाल्याने सिनेमा चालला. दीदींनी संगीत दिले असले तरी संगीतकार खऱ्या अर्थाने हृदयनाथच आहे.
-------
विदेशी लोकांसह अनेक कार्यक्रम
सध्या पाश्चात्त्य संगीत पसंत केले जात आहे. त्यामुळे मी पाश्चात्त्य संगीतकारांसहसुद्धा विदेशात अनेक कार्यक्रम करते आहे आणि तेथल्या रसिकांचा छान प्रतिसाद मिळतो आहे. त्यात माझी नातही माझ्यासोबत असते. मंगेशकरांचा वारसा कोण चालविणार ते सांगता येत नाही. माझी नात मात्र खूप छान गाते पण तिला फ्युजनमध्ये आवड आहे. त्यामुळे ती भविष्यात काय करेल ते काळच ठरवेल. मला दुसरे कुणी वारसा चालविणारे मात्र दिसत नाही.
-----
रिॲलिटी शोने गायक घडत नाही
अनेक वाहिन्यांवरच्या रिॲलिटी शो मधून चांगले गायक दिसतात. अनेकांची मी प्रशंसाही केली आहे. पण हे गायक नंतर तालीम करीत नाही. त्यानंतर थेट त्यांचे स्टेज शो सुरू होतात आणि ते संपतात. कारण स्टेज शोमुळे गळ्यावर ताण येतो आणि आवाजात बदल होतो. मी पार्श्वगायन करताना स्टेज शो फारच कमी केले आहेत. पण पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावताना गायक संपतो. गेल्या अनेक वर्षात सोनु निगम, कुणाल गांजावाला आणि श्रेया घोषाल यांच्या पलिकडे कोण समोर आले. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चांगले संबंध होते. ते फार मोठे व्यक्ती होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाने मी प्रभावित झाले.