शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

सहा तास वीजपुरवठा बंद पूर्वसूचना न देता दुरुस्तीची कामे : नागरिक हैराण, अनेक भागात तक्रारी

By admin | Updated: February 14, 2016 00:41 IST

जळगाव- महावितरणतर्फे शहरात वीज तारांना अडथळा ठरणार्‍या फांद्या तोडणे, तारा ओढणे व दुरुस्तीची इतर कामे शनिवारी सकाळीच हाती घेण्यात आली. पण दुरुस्तीची कामे हाती घेताना शहरवासीयांना पूर्वसूचना कुठल्याही माध्यमाद्वारे दिली नाही. यामुळे लोडशेडिंग सुरू झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. याबाबतची विचारणा करणारे फोन महावितरणच्या कार्यालयात दिवसभर खणाणत होते.

जळगाव- महावितरणतर्फे शहरात वीज तारांना अडथळा ठरणार्‍या फांद्या तोडणे, तारा ओढणे व दुरुस्तीची इतर कामे शनिवारी सकाळीच हाती घेण्यात आली. पण दुरुस्तीची कामे हाती घेताना शहरवासीयांना पूर्वसूचना कुठल्याही माध्यमाद्वारे दिली नाही. यामुळे लोडशेडिंग सुरू झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. याबाबतची विचारणा करणारे फोन महावितरणच्या कार्यालयात दिवसभर खणाणत होते.
नागरिकांच्या तक्रारी, प्रश्नांना उत्तरे देताना महावितरणच्या अधिकार्‍यांचीही भंबेरी उडाली. काही नागरिक तर तक्रारी घेऊन थेट कोंबडी बाजारमधील महावितरणच्या पॉवर हाऊसमध्ये पोहोचले. त्यांना दुरुस्तीची कामे सुरू असल्याने वीज बंद केली, असे स्पष्टीकरण वरिष्ठांनी दिले.

या भागात वीज गुल
शहरात रिंगरोड, गणेश कॉलनी, भगवाननगर, भगवाननगर, पांडे चौक, स्वातंत्र्य चौक, भास्कर मार्केट आदी भागात वीजपुरवठा तब्बल सहा तास बंद होता. यापैकी काही भागात सकाळी नऊ ते चार आणि काही भागात सकाळी ११ ते सायंकाळी पाच या दरम्यान वीज बंद करण्यात आली होती.

लोडशेडिंग सुरू झाल्याची चर्चा...
वीज दीर्घकाळ बंद असल्याने लोडशेडिंग सुरू झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. याची विचारणा थेट महावितरणच्या कार्यालयात नागरिकांनी केली. त्यावर दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने वीज बंद करावी लागली, असे स्पष्टीकरण अधिकार्‍यांनी नागरिकांना दिले.

पूर्वसूचना पोहोचलीच नाही
कुठलेही दुरुस्तीचे किंवा इतर काम हाती घेताना वीजपुरवठा बंद करावा लागतो. तो चार ते सहा तास बंद करायचा असतो. यापेक्षा अधिक वेळ तो बंद करता येत नाही. पण वीजपुरवठा बंद करताना त्याची पूर्वसूचना वृत्तपत्र किंवा इतर माध्यमांद्वारे प्रसिद्ध, प्रसारित करावी लागते. नेमकी हीच प्रसिद्धी किंवा वीज बंद ठेवण्याबाबतची माहिती महावितरणतर्फे शनिवारी देण्यात आली नाही आणि कामे हाती घेण्यात आली. ती सायंकाळपर्यंत सुरू होती, असे सांगण्यात आले.

दोन विभागांमध्ये कामे
महावितरणचे शहरात दोन विभाग आहेत. या दोन्ही विभागांमधील १० फिडरची वीज बंद केली होती. त्यासंदर्भात दोन अतिरिक्त कार्यकारी अभियंता, १६ अभियंता कार्यवाहीसाठी नियुक्त केले होते. अर्थातच वीज बंद केल्याची पूर्वसूचना न देण्यास हे अधिकारी दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर शहराची जबाबदारी पार पाडणारे कार्यकारी अभियंता एस.एस.सदामते यांनी आपल्या अधिकार्‍यांना विचारणा केल्याची माहिती मिळाली.