शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

उत्तर प्रदेशामधून ‘स्कॅम’ला दूर करा

By admin | Updated: February 5, 2017 01:58 IST

मी नोटाबंदीद्वारे लुटलेले भ्रष्ट लोक आता मला खाली खेचण्यासाठी एकत्र आले आहेत, असा आरोप करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी समाजवादी पार्टी व काँग्रेस

मेरठ : मी नोटाबंदीद्वारे लुटलेले भ्रष्ट लोक आता मला खाली खेचण्यासाठी एकत्र आले आहेत, असा आरोप करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी समाजवादी पार्टी व काँग्रेस यांच्या आघाडीवर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणकीच्या घोषणेनंतर मोदींची पहिली जाहीर सभा झाली.अगदी कालपर्यंत एकमेकांची उणीदुणी काढणारे हे पक्ष आता स्वत:ला वाचविण्यासाठी एकमेकांना आलिंगन देत आहेत, असे ते सपा व काँग्रेसला उद्देशून म्हणाले. राज्याला स्कॅममुक्त (घोटाळेमुक्त) (स्कॅम : एस फॉर समाजवादी पार्टी, सी फॉर काँग्रेस, ए फॉर अखिलेश आणि एम फॉर मायावती) करा, असे आवाहन त्यांनी उत्तरप्रदेशच्या जनतेला केले. एकीकडे भाजपचा विकासाचा अजेंडा आणि दुसरीकडे गुन्हेगारांना आश्रय व जमीन तसेच खाणमाफियांना प्रोत्साहन देणारे यापैकी एकाची तुम्हाला निवड करायची आहे, असे मोदी म्हणाले. तासाभराच्या भाषणात ते भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावर विस्ताराने बोलून राज्याचे भवितव्य बदलण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपा सत्तेवर आल्यास राज्यातील शेतकऱ्यांना १४ दिवसांत कर्जमुक्त करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.काँग्रेसने सपा सरकारविरुद्ध जोरदार मोहीम उघडली होती आणि अचानक दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केली. रात्रीतून असे काय झाले की, ते मांडीला मांडी लावू बसले याचे आश्चर्य वाटते, असा टोला त्यांनी लगावला. जे स्वत:ला वाचवू शकत नाहीत ते उत्तर प्रदेशलाही वाचवू शकणार नाहीत, असेही ते म्हणाले. भाषणात त्यांनी शेतकरी वर्गाला खूष करण्याचाही प्रयत्न केला. राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर १४ दिवसांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. मेरठमधूनच १८५७ मध्ये ब्रिटिशांविरुद्धचे बंड सुरू झाले होते. त्यामुळे दारिद्य्र, भ्रष्ट दले आणि भूमाफियांविरुद्धच्या लढ्यासाठी आपण या ठिकाणाची निवड केली, असे नमूद करून पंतप्रधानांनी नोटाबंदी आणि लक्ष्यभेदी हल्ल्याच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. मला छोट्या लढाईत रस नाही. मी वरच्या पातळीवरील यंत्रणा स्वच्छ करू इच्छितो, असे ते उद्गारले. पक्ष तिकीटे विकून नोटांनी खोल्या भरून ठेवलेल्या लोकांना मी त्यांचे पैसे बँकेत जमा करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांचा माझ्यावर राग आहे. ते सर्वजण माझ्याविरुद्ध एकजूट होतील हे ठाऊक आहे. (वृत्तसंस्था)मला पंतप्रधान बनविणारे उत्तर प्रदेश हेच राज्य आहे. या राज्याचे माझ्यावर उपकार असून, त्याची मी परतफेड करू इच्छितो. तथापि, त्यासाठी केंद्राच्या हातात हात घालून काम करणारे सरकार राज्यात हवे आहे. - पंतप्रधान