शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

आधी गरिबांचा त्रास दूर करा!

By admin | Updated: January 6, 2017 03:16 IST

नोटाबंदीचा निर्णय आणि सरकार राबवित असलेली आर्थिक धोरणे यामुळे भविष्यात विकास अपेक्षित असला तरी हे दूरचे स्वप्न आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय आणि सरकार राबवित असलेली आर्थिक धोरणे यामुळे भविष्यात विकास अपेक्षित असला तरी हे दूरचे स्वप्न आहे. देशातील पिचलेल्या गरिबांना तेवढे थांबण्याचा धीर नसल्याने त्यांचा त्रास दूर करण्याची पावले आत्ता लगेचच उचलायला हवीत, असे म्हणून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदी सरकारला गुरुवारी कानपिचक्या दिल्या.

राष्ट्रपती भवनातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून देशभरातील राज्यपाल आणि नायब राज्यपालांना दिलेल्या संदेशात मुखर्जी यांनी हे मत व्यक्त केले. नोटाबंदीचा ५० दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर राष्ट्रपतींनी त्या विषयावर केलेले हे पहिलेच भाष्य होते. पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुखर्जी यांनी त्याचे स्वागत करून ‘या धाडसी पावलामुळे काळा पैसा व बनावट चलन हुडकून काढण्यास मदत होईल, असे म्हटले होते. बुधवारी राज्यपालांना केलेल्या संबोधनातही त्यांचा सूर विरोधाचा नव्हता. भविष्यातील फायद्यासाठी असे निर्णय व धोरणे राबविणे समजण्यासारखे असले तरी त्याचा गोरगरिबांना होणारा त्रास लगेचच कमी करायला हवा, असा वडिलकीचा सल्ला होता.

राष्ट्रपती म्हणाले की, काळा पैसा निष्प्रभ करणे व भ्रष्टाचाराचा बीमोड करणे यासाठी केलेल्या नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात मंदावण्याची शक्यता आहे. दूरगामी विकासासाठी कदाचित गरिबांना काही काळ त्रास होणे अपरिहार्य असले तरी तो दूर करण्यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी.