शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

धर्म नको संघर्षाचे कारण

By admin | Updated: January 26, 2015 03:30 IST

एकता शक्ती आहे आणि प्रभुत्व दुर्बलता आहे़ भारताची प्रज्ञा आपणास हेच शिकवते़ धर्म संघर्षाचे कारण बनता कामा नये,

नवी दिल्ली : एकता शक्ती आहे आणि प्रभुत्व दुर्बलता आहे़ भारताची प्रज्ञा आपणास हेच शिकवते़ धर्म संघर्षाचे कारण बनता कामा नये, असे प्रतिपादन ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज रविवारी केले़‘धर्म ऐक्याची शक्ती आहे़ आपण याला संघर्षाचे कारण बनू देऊ शकत नाही’, या महात्मा गांधी यांच्या वचनाचे स्मरण करून देत, देशातील विविध धर्मसमुदायातील परस्पर सहकार्य आणि सद्भावनेवर राष्ट्रपतींनी यावेळी भर दिला़ ते म्हणाले की, लोकशाहीने बहाल केलेले स्वातंत्र्य कधीकधी उन्माद निर्माण करते़ हा उन्माद आपल्या पारंपरिक प्रकृतिविरुद्ध आहे़ शब्दांचा हिंसाचार दु:ख, वेदना देऊन लोकांच्या भावना दुखावते़ गांधीजी म्हणायचे, धर्म ऐक्याची शक्ती आहे़ ते संघर्षाचे कारण बनता कामा नये़ भारताने कायम सर्वधर्मसमभावावर विश्वास ठेवला आहे़ हा सर्वधर्मसमभाव हीच भारताची खरी ओळख आहे़भारतीय राज्यघटना लोकशाहीचे पवित्र पुस्तक आहे़ भारताच्या राज्यघटनेने सर्वधर्मसमभाव शिकवला़ विविध धर्मसमुदायातील सहशनशीलता, सद्भावना वाढवली़ आता या मूल्यांची अधिक सावधगिरीने जपणूक करण्याची गरज आहे़देशात धर्मांतराच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना आणि काही हिंदुत्ववादी संघटना व पक्षांकडून महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसे याचे महिमा पठण सुरू असताना, राष्ट्रपतींनी सर्वधर्मसमभावावर भाष्य करणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे़दहशतवादाच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्ताला लक्ष्य केले़ भारत आपल्या शत्रूंबाबत गाफिल राहण्याचा धोका पत्करू शकत नाही़ शांती, अहिंसा आणि एक उत्तम शेजारी देश भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्त्वे आहेत़ पण भारताच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकणाऱ्या शत्रूंपासून भारत गाफिल राहू शकत नाही़ भारत आणि भारताच्या जनतेविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या शत्रूंना नामोहरम करण्याची सर्व शक्ती आमच्याकडे आहे, असे राष्ट्रपती म्हणाले़महिलांवरील अत्याचार, बलात्कार, हुंड्यासाठी त्यांचा छळ या सामाजिक कुप्रथांवरही राष्ट्रपतींनी प्रहार केला़ बलात्कार, रस्त्यांवर महिलांची काढली जाणारी छेड, हुंड्यासाठी तिची हत्या यामुळे महिलांना भयभीत केले आहे़ हे बघणे दु:खदायी आहे़ महिलांचा सन्मान करणारा आणि त्यांना सक्षम करणारा देशच एक जागतिक शक्ती बनू शकतो़ म्हणूनच प्रत्येक भारतीयाने महिलांना कुठल्याही प्रकारच्या हिंसेपासून बचाव करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले़