शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

धर्म नको संघर्षाचे कारण

By admin | Updated: January 26, 2015 03:30 IST

एकता शक्ती आहे आणि प्रभुत्व दुर्बलता आहे़ भारताची प्रज्ञा आपणास हेच शिकवते़ धर्म संघर्षाचे कारण बनता कामा नये,

नवी दिल्ली : एकता शक्ती आहे आणि प्रभुत्व दुर्बलता आहे़ भारताची प्रज्ञा आपणास हेच शिकवते़ धर्म संघर्षाचे कारण बनता कामा नये, असे प्रतिपादन ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज रविवारी केले़‘धर्म ऐक्याची शक्ती आहे़ आपण याला संघर्षाचे कारण बनू देऊ शकत नाही’, या महात्मा गांधी यांच्या वचनाचे स्मरण करून देत, देशातील विविध धर्मसमुदायातील परस्पर सहकार्य आणि सद्भावनेवर राष्ट्रपतींनी यावेळी भर दिला़ ते म्हणाले की, लोकशाहीने बहाल केलेले स्वातंत्र्य कधीकधी उन्माद निर्माण करते़ हा उन्माद आपल्या पारंपरिक प्रकृतिविरुद्ध आहे़ शब्दांचा हिंसाचार दु:ख, वेदना देऊन लोकांच्या भावना दुखावते़ गांधीजी म्हणायचे, धर्म ऐक्याची शक्ती आहे़ ते संघर्षाचे कारण बनता कामा नये़ भारताने कायम सर्वधर्मसमभावावर विश्वास ठेवला आहे़ हा सर्वधर्मसमभाव हीच भारताची खरी ओळख आहे़भारतीय राज्यघटना लोकशाहीचे पवित्र पुस्तक आहे़ भारताच्या राज्यघटनेने सर्वधर्मसमभाव शिकवला़ विविध धर्मसमुदायातील सहशनशीलता, सद्भावना वाढवली़ आता या मूल्यांची अधिक सावधगिरीने जपणूक करण्याची गरज आहे़देशात धर्मांतराच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना आणि काही हिंदुत्ववादी संघटना व पक्षांकडून महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसे याचे महिमा पठण सुरू असताना, राष्ट्रपतींनी सर्वधर्मसमभावावर भाष्य करणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे़दहशतवादाच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्ताला लक्ष्य केले़ भारत आपल्या शत्रूंबाबत गाफिल राहण्याचा धोका पत्करू शकत नाही़ शांती, अहिंसा आणि एक उत्तम शेजारी देश भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्त्वे आहेत़ पण भारताच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकणाऱ्या शत्रूंपासून भारत गाफिल राहू शकत नाही़ भारत आणि भारताच्या जनतेविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या शत्रूंना नामोहरम करण्याची सर्व शक्ती आमच्याकडे आहे, असे राष्ट्रपती म्हणाले़महिलांवरील अत्याचार, बलात्कार, हुंड्यासाठी त्यांचा छळ या सामाजिक कुप्रथांवरही राष्ट्रपतींनी प्रहार केला़ बलात्कार, रस्त्यांवर महिलांची काढली जाणारी छेड, हुंड्यासाठी तिची हत्या यामुळे महिलांना भयभीत केले आहे़ हे बघणे दु:खदायी आहे़ महिलांचा सन्मान करणारा आणि त्यांना सक्षम करणारा देशच एक जागतिक शक्ती बनू शकतो़ म्हणूनच प्रत्येक भारतीयाने महिलांना कुठल्याही प्रकारच्या हिंसेपासून बचाव करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले़