शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

सात राज्यांतच शेतक-यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:44 IST

नैसर्गिक आपत्तीतून पिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणा-या पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत देशभर शेतकरी वर्गावर भ्रमनिरास होण्याची पाळी आली आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : नैसर्गिक आपत्तीतून पिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणा-या पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत देशभर शेतकरी वर्गावर भ्रमनिरास होण्याची पाळी आली आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंडसह सात राज्ये वगळता खरीप पिकांच्या नुकसानीपोटी अन्य राज्यात विम्याची पूर्ण रक्कम शेतक-यांच्या हाती लागलेली नाही.पंतप्रधान पीक विमा योजनेचा २0१६ च्या खरीप हंगामात सरकारने शुभारंभ केला. बिगरमोसमी पाऊस, गारपीट व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकºयांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विम्याच्या रकमेबाबत ४५ दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. या योजनेला प्रतिसाद देत २२ राज्यांतील ५९ लाख ९५ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी पिकांचा विमा उतरवला.ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांनी नुकसान भरपाईपोटी ५५१५ कोटी ५२ लाख रुपये रकमेची मागणी केली. यापैकी किमान आंशिक रक्कम नियमानुसार ४५ दिवसात शेतकºयांना मिळणे आवश्यक होते. प्रत्यक्षात १९ जुलैपर्यंत फक्त ३३१४.१५ कोटी रुपयांचीच भरपाई शेतकºयांच्या पदरात पडली. पीक विमा योजनेत नुकसान भरपाईपोटी द्याव्या लागणाºया रकमेच्या ३३ टक्के रक्कम विमा कंपनी देते व बाकी ६७ टक्के रकमेत प्रत्येकी ५0 टक्के रक्कम राज्य व केंद्र सरकार सबसिडीच्या स्वरूपात विमा कंपनीला अदा करते.राज्य सरकारांना या योजनेत फारसा रस नाही. महाराष्ट्रात पीक विमा भरण्याच्या मुदतीवरूनशेतकरी वर्गाचा आक्रोश सुरू आहे. देशाच्या अन्य राज्यांतही पीक विम्याच्या अमलबजावणीची स्थिती दारूण आहे.