शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

सात राज्यांतच शेतक-यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:44 IST

नैसर्गिक आपत्तीतून पिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणा-या पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत देशभर शेतकरी वर्गावर भ्रमनिरास होण्याची पाळी आली आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : नैसर्गिक आपत्तीतून पिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणा-या पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत देशभर शेतकरी वर्गावर भ्रमनिरास होण्याची पाळी आली आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंडसह सात राज्ये वगळता खरीप पिकांच्या नुकसानीपोटी अन्य राज्यात विम्याची पूर्ण रक्कम शेतक-यांच्या हाती लागलेली नाही.पंतप्रधान पीक विमा योजनेचा २0१६ च्या खरीप हंगामात सरकारने शुभारंभ केला. बिगरमोसमी पाऊस, गारपीट व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकºयांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विम्याच्या रकमेबाबत ४५ दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. या योजनेला प्रतिसाद देत २२ राज्यांतील ५९ लाख ९५ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी पिकांचा विमा उतरवला.ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांनी नुकसान भरपाईपोटी ५५१५ कोटी ५२ लाख रुपये रकमेची मागणी केली. यापैकी किमान आंशिक रक्कम नियमानुसार ४५ दिवसात शेतकºयांना मिळणे आवश्यक होते. प्रत्यक्षात १९ जुलैपर्यंत फक्त ३३१४.१५ कोटी रुपयांचीच भरपाई शेतकºयांच्या पदरात पडली. पीक विमा योजनेत नुकसान भरपाईपोटी द्याव्या लागणाºया रकमेच्या ३३ टक्के रक्कम विमा कंपनी देते व बाकी ६७ टक्के रकमेत प्रत्येकी ५0 टक्के रक्कम राज्य व केंद्र सरकार सबसिडीच्या स्वरूपात विमा कंपनीला अदा करते.राज्य सरकारांना या योजनेत फारसा रस नाही. महाराष्ट्रात पीक विमा भरण्याच्या मुदतीवरूनशेतकरी वर्गाचा आक्रोश सुरू आहे. देशाच्या अन्य राज्यांतही पीक विम्याच्या अमलबजावणीची स्थिती दारूण आहे.