शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पान-५ मयेत वीज समस्या नित्याचीच; नागरिक हैराण

By admin | Updated: June 13, 2014 06:58 IST

मये : सध्या मयेवासियांना दररोज विजेविना दिवस काढावे लागत आहेत. वीज समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. डोंगराळ आणि शेतीच्या भागातून आणलेली मुख्य वाहिनी दिवसातून चार-पाच वेळा तुटून पडते आणि ती पूर्ववत करताना वीज कर्मचार्‍यांची तारांबळ उडते. मयेवासीय उकाड्यामुळे आणि डासांमुळे त्रस्त झाले आहेत. या कारणामुळे रात्री जागून काढाव्या लागतात.

मये : सध्या मयेवासियांना दररोज विजेविना दिवस काढावे लागत आहेत. वीज समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. डोंगराळ आणि शेतीच्या भागातून आणलेली मुख्य वाहिनी दिवसातून चार-पाच वेळा तुटून पडते आणि ती पूर्ववत करताना वीज कर्मचार्‍यांची तारांबळ उडते. मयेवासीय उकाड्यामुळे आणि डासांमुळे त्रस्त झाले आहेत. या कारणामुळे रात्री जागून काढाव्या लागतात. मये गावासाठी जोडणारी मुख्य वीजवाहिनी नार्वे, वरपाल, बायंगिणी येथील डोंगरमाथ्यावरून आणलेली आहे. ही वीजवाहिनी नंतर इथल्या चिखलमय व दलदलीच्या भागातून पुढे मये गावाला जोडली आहे. लोखंडी खांब गंजलेले आहेत. वीज तारा जुन्या असल्याने हलक्याशा वार्‍यानेही त्या तुटून पडतात. हा भाग अडचणीचा असल्याने रात्रीच्या वेळी दुरुस्ती करण्यात बरीच अडचण निर्माण होते. ही वीजवाहिनी बदलावी म्हणून नागरिकांनी वारंवार मागणी करूनही वीज खात्याने मयेवासियांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावणे पसंत केले आहे.विजेच्या समस्या निवारण्यासाठी मयेत भूमिगत वीजवाहिनी घालणे हाच तेवढा उपाय आहे. शारदानगर येथून किंवा पैरा फिडरवरून अंडरग्राउंड केबल घालून पंचायत कार्यालयापर्यंत आणून येथील फिडरला पुरवठा के ल्यास विजेची समस्या कायमची सुटणार आहे. त्यासाठी डिचोली वीज कार्यालयाने एक योजना तयार केली असून प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, निधीअभावी ती फ ाईल धूळ खात पडली आहे. गेल्या एक महिन्यापासून मयेवासियांना भेडसावणार्‍या विजेच्या समस्येमुळे मयेत संतापाचे वातावरण पसरलेले असून याचा कधीही भडका उडू शकतो. (प्रतिनिधी)