शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

ठोस कामगिरी कमी, वादच जास्त

By admin | Updated: May 12, 2015 01:32 IST

आपल्या विशिष्ट वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांपैकी एक असल्या

आपल्या विशिष्ट वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांपैकी एक असल्या तरी भाजपच्या सर्वाधिक निष्प्रभ नेत्यांमध्ये त्यांची गणना होत आहे. रालोआ सरकारच्या वर्षभराच्या कारकीर्दीत स्वराज यांना कोणतेही महत्त्व देण्यात आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विदेश दौऱ्यांमध्ये स्वराज यांना सोबत नेण्याचे टाळले. धोरणात्मक निर्णयातही त्यांचा सल्ला घेत नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की, मोदींना ज्या देशांचा दौरा करायचा असतो तेथील राजदूतांशी थेट संपर्क साधून ते रणनीती आखतात. अलीकडेच भारताने इराणसोबत सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा छबहार बंदराबाबत केलेल्या कराराला अंतिम आकार देण्याचे काम मोदींनी स्वराज यांना न देता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपविले होते. विदेश सचिव सुजातासिंग यांना अचानक पदावरून हटविताच सुषमा स्वराज यांचे पंख कापण्याचे काम सुरू झाले. अमेरिकेचे तत्कालीन राजदूत एस. जयशंकर यांना नवे विदेश सचिव बनविण्यात आले. स्वराज यांना मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीबाहेर ठेवण्यात आले. मोदींनी महत्त्वपूर्ण विदेश दौऱ्यात सुषमा स्वराज यांची सोबत टाळली. स्वराज यांनी मोदींसोबत भेटी दिल्या त्या ठिकाणी त्यांना जास्त महत्त्व दिले गेले नाही. राजनैतिक पातळीवर फारसे महत्त्व नसलेल्या देशांमध्येच त्यांना पाठविण्यात आले. स्वराज यांचे कर्तुत्व फायलींवर स्वाक्षरी करण्यापुरते सिमित दिसते. परराष्ट्रमंत्र्यांच्या पदाचे महत्त्व कमी केल्यामुळे विरोधकांनीही सरकारवर हल्ला करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. स्वराज यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये केलेला चीनचा दौरा महत्त्वपूर्ण राहिला पण मोदींनी चीनसोबत संबंध सुधारण्याचे पूर्ण श्रेय स्वत:कडे घेतले आहे.