शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

ठोस कामगिरी कमी, वादच जास्त

By admin | Updated: May 12, 2015 01:32 IST

आपल्या विशिष्ट वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांपैकी एक असल्या

आपल्या विशिष्ट वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांपैकी एक असल्या तरी भाजपच्या सर्वाधिक निष्प्रभ नेत्यांमध्ये त्यांची गणना होत आहे. रालोआ सरकारच्या वर्षभराच्या कारकीर्दीत स्वराज यांना कोणतेही महत्त्व देण्यात आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विदेश दौऱ्यांमध्ये स्वराज यांना सोबत नेण्याचे टाळले. धोरणात्मक निर्णयातही त्यांचा सल्ला घेत नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की, मोदींना ज्या देशांचा दौरा करायचा असतो तेथील राजदूतांशी थेट संपर्क साधून ते रणनीती आखतात. अलीकडेच भारताने इराणसोबत सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा छबहार बंदराबाबत केलेल्या कराराला अंतिम आकार देण्याचे काम मोदींनी स्वराज यांना न देता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपविले होते. विदेश सचिव सुजातासिंग यांना अचानक पदावरून हटविताच सुषमा स्वराज यांचे पंख कापण्याचे काम सुरू झाले. अमेरिकेचे तत्कालीन राजदूत एस. जयशंकर यांना नवे विदेश सचिव बनविण्यात आले. स्वराज यांना मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीबाहेर ठेवण्यात आले. मोदींनी महत्त्वपूर्ण विदेश दौऱ्यात सुषमा स्वराज यांची सोबत टाळली. स्वराज यांनी मोदींसोबत भेटी दिल्या त्या ठिकाणी त्यांना जास्त महत्त्व दिले गेले नाही. राजनैतिक पातळीवर फारसे महत्त्व नसलेल्या देशांमध्येच त्यांना पाठविण्यात आले. स्वराज यांचे कर्तुत्व फायलींवर स्वाक्षरी करण्यापुरते सिमित दिसते. परराष्ट्रमंत्र्यांच्या पदाचे महत्त्व कमी केल्यामुळे विरोधकांनीही सरकारवर हल्ला करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. स्वराज यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये केलेला चीनचा दौरा महत्त्वपूर्ण राहिला पण मोदींनी चीनसोबत संबंध सुधारण्याचे पूर्ण श्रेय स्वत:कडे घेतले आहे.