शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सरकारी खर्च काटकसरीने करा; सोनिया गांधींचे मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 05:09 IST

वेतनकपातीच्या सरकारच्या निर्णयास पाठिंबा दिला व काटकसर ही आताच्या काळाची गरज आहे असे म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईस पैसा कमी पडू नये, यासाठी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्याखेरीज पंतप्रधान, सर्व मंत्री व खासदारांच्या वेतनात एक वर्षासाठी ३० टक्के कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सरकारच्या सर्वच खर्चात काटकसर करण्याची सूचना पंतप्रधान मोदी यांना मंगळवारी केली.गांधी यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात, वेतनकपातीच्या सरकारच्या निर्णयास पाठिंबा दिला व काटकसर ही आताच्या काळाची गरज आहे यावर भर देत ती कशी करता येईल, याविषयी पंतप्रधानांना पाच सूचना केल्या.मोदी रविवारी विविध पक्षांच्या नेत्यांशी फोनवर बोलले होते. तेव्हा त्यांनी सूचना करण्यास सांगितले होते. त्यानुसार सोनियाजींनी हे पत्र लिहिले.देशात कोरोनाने एवढा गहजब सुरू असताना मोदी सरकारने दिल्लीतील सर्व शासकीय इमारतींच्या मुख्य संकुलाच्या (सेंट्रल व्हिस्टा) आधुनिकीकरण व सुशोभीकरणाच्या २० हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. ते काम सरकारने सर्वात आधी स्थगित करावे, असे सोनिया गांधी यांनी पत्रात लिहिले. तसेच सरकारने सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व सरकारी जाहिराती दोन वर्षांसाठी बंद कराव्यात, असेही त्यांनी सुचविले.‘पीएमकेअर्स’ या निधीत जमा होणारी रक्कम ‘अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व व कार्यक्षमतेसाठी’, तात्काळ ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीत’ वर्ग करावी, असेही पत्रात सुचविण्यात आले. (वृत्तसंस्था)

हिमाचलमध्येही मंत्री, आमदारांची वेतनकपातकेंद्र सरकारचे अनुकरण करीत हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळानेही मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, आमदार व सर्व वैधानिक मंडळे आणि महामंडळांच्या अध्यक्षांच्या वेतनात पुढील एक वर्षासाठी ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. यातून वाचणारा पैसा हिमाचल कोविद-१९ निधीत जमा केला जाईल.

सोनिया गांधींची सूचना फारच दु:खदायक-एनबीएसरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी दोन वर्षे प्रसारमाध्यमांना जाहिराती देण्यावर बंदी घालावी या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या सूचनेचे द न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने (एनबीए) मंगळवारी ‘फारच दु:खदायक’ अशा शब्दांत वर्णन केले.गांधी यांची ही सूचना प्रसारमाध्यमातील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य फारच खालावणारी आहे, असेही म्हटले.सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोविड-१९ शी लढण्यासाठी ज्या वेगवेगळ््या सूचना पत्र लिहून केल्या आहेत त्यात सरकारने व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे व आॅनलाईनना जाहिराती देण्यावर दोन वर्षे पूर्ण बंदी घालावी अशीही एक सूचना आहे. गांधी यांची दोन वर्षे बंदीची ही सूचना फारच दु:खदायक आहे, असे एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी निवेदनात म्हटले.‘‘प्रसारमाध्यमातील कर्मचारी स्वत:च्या जीविताची चिंता न करता महामारीशी संबंधित बातम्या राष्ट्रीय कर्तव्य म्हणून देत असताना काँग्रेस अध्यक्षांकडून अशी सूचना केली जावी हे फारच मनौधैर्य खचवणारे आहे,’’ असे शर्मा म्हणाले.आर्थिक मंदीमुळे इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या जाहिरातींच्या महसूलात आधीच घट झाली आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. याशिवाय वृत्तवाहिन्या त्यांच्या बातमीदारांच्या व प्रॉडक्शन कर्मचाºयांना सुरक्षा देण्यासाठी मोठा खर्च करत आहेत. सरकार आणि सार्वजनिक उद्योगांच्या जाहिरातींवर पूर्ण बंदीची सूचना ही चुकीच्या वेळेचीच नव्हे तर लहरी असल्याचे त्यात म्हटले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांनी मोदी यांच्याकडे प्रसारमाध्यमांना दोन वर्षे जाहिरातींवरील बंदीची केलेली सूचना ‘निरोगी आणि स्वतंत्र प्रसारमाध्यमांसाठी’ मागे घ्यावी, अशी मागणीही शर्मा यांनी केली आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी