शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी प्रवेश परीक्षेपूर्वी कल चाचणीची शिफारस

By admin | Updated: November 8, 2015 00:06 IST

प्रतिष्ठेच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट््स आॅफ टेक्नॉलॉजी’मध्ये (आयआयटी) प्रवेशासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा आणि त्या अनुषंगाने वाढलेले

नवी दिल्ली : प्रतिष्ठेच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट््स आॅफ टेक्नॉलॉजी’मध्ये (आयआयटी) प्रवेशासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा आणि त्या अनुषंगाने वाढलेले कोचिंग क्लासेसचे प्रस्थ कमी करण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) घेण्यापूर्वी प्रवेशेच्छुंची कल चाचणी (अ‍ॅप्टीट्यूट टेस्ट) घेण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे.सध्याच्या ‘जेईई’ परीक्षा पद्धतीत बदल सुचविण्यासाठी आयआयटी कौन्सिलने मुंबई आयआयटीचे संचालक प्रा. अशोक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर व्यक्तींची समिती नेमली होती. समितीने अहवाल सरकारला सादर केला. या शिफारशी सर्व संबंधितांकडून मते घेण्यासाठी जाहीर करण्यात आल्या असून त्यानंतर ‘जेईई’च्या विद्यमान स्वरूपात जे काही मोठे बदल करायचे ते वर्ष २०१७ पासून पुढील कालासाठी करण्याचे ठरविले आहे. फक्त यावेळी ‘जेईई (अ‍ॅडव्हान्स्ड)ला दीडऐवजी दोन लाख विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. तसेच ‘जेईई (मेन) परीक्षेत शालांत परीक्षा मंडळांच्या परीक्षेतील गुणांना दिले जाणारे ‘वेटेज’ कायम असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)समितीने केलेल्या प्रमुख शिफारशी अशाजेईई परीक्षेपूर्वी प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक कल आणि चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता जोखण्यासाठी ‘अ‍ॅप्टीट्यूट टेस्ट’ घेतली जावी.अशी अ‍ॅप्टीट्यूट टेस्ट घेण्यासाठी एक राष्ट्रीय टेस्टिंग सर्व्हिस स्थापन केली जावी. ही टेस्ट आॅनलाईन पद्धतीने वर्षातून दोनदा घेतली जावी. ज्यात कोचिंग क्लासचा काही उपयोग होणार नाही, अशी ही चाचणी असावी.या अ‍ॅप्टीट्यूट टेस्टमधील कामगिरीच्या आधारे जेईई परीक्षेला बसण्यास पात्र अशा सुमारे चार लाख परीक्षार्थींची निवड केली जावी.‘जेईई’ परीक्षा ‘मेन’ व ’अ‍ॅडव्हान्स्ड’ अशा दोन टप्प्यांत न घेता ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’च्या धर्तीवर एकाच टप्प्यात घेतली जावी. ही परीक्षा त्या आयआयटींनी घ्यावी व मुख्यत्वे पदार्थविज्ञान, रसायनसास्त्र व गणिताचे ज्ञान त्यात तपासले जावे.या परीक्षेतून सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना गुणवत्ताक्रम (रँक) देऊन प्रवेश दिले जावेत.कोचिंग क्लासच्या कुबड्या न घेता विद्यार्थ्यांना जेईई परीक्षेची तयारी स्वत:हून चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी आयआयटींनी अभिरूप जेईई परीक्षा घेण्याची व्यवस्था विकसित करावी. यासाठी ‘एमओओसीएस’ प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्याची शक्यताही तपासून पाहावी.मुळातच विज्ञानाकडे कल असणारे विद्यार्थी इयत्त १२वी ला येईपर्यंत, त्यांची कोचिंग क्लास न लावताही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची चांगली तयारी व्हावी यासाठी राज्यांच्या शिक्षण मंडळांचे पाठ्यक्रम व परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उपाय योजावेत.हे होईपर्यंत म्हणजे वर्ष २०१६ व २०१७ साठी सध्याची द्विस्तरीय जेईई परीक्षा पद्धती सुरु ठेवावी.जेईई मेन परीक्षेत गुणानुक्रमे पहिल्या दोन लाख विद्यार्थ्यांनाच जेईई (अ‍ॅडव्हान्स्ड) परीक्षेला बसू द्यावे.