शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

रस्ता रुंदीकरणात पाडलेली सर्व मंदिरे पुन्हा बांधून देणार

By admin | Updated: July 5, 2016 04:22 IST

विजयवाडा शहराच्या वन टाऊन भागात रस्ता रुंदीकरण आणि सुशोभिकरणासाठी पाच मंदिरे पाडली गेल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये उसळलेला संताप व या घटनेला आलेला गडद राजकीय

विजयवाडा : विजयवाडा शहराच्या वन टाऊन भागात रस्ता रुंदीकरण आणि सुशोभिकरणासाठी पाच मंदिरे पाडली गेल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये उसळलेला संताप व या घटनेला आलेला गडद राजकीय रंग लक्षात घेऊन चंद्राबाबू नायडु यांच्या तेलगु देसमच्या सरकारला ही सर्व मंदिरे त्याच जागी पुन्हा बांधून देण्याची घोषणा करावी लागली आहे.शहरात चातुर्मासानिमित्त ‘कृष्ण पुष्करम’ नावाचा मोठा उत्सव भरतो व त्यावेळी लाखो भाविकांची गर्दी लोटते. उत्सवाचे नियोजन सुलभ व्हावे यासाठी शहर प्रशासनाने त्या भागातील रस्ते रुंद करण्याची व सुशोभिकरणाची योजना हाती घेतली आहे. या कामाचा भाग म्हणून प्रसिद्ध विनायक मंदिर, कनकदुर्गानगर भागातील ऐतिहासिक विजयेश्वर स्वामी मंदिर, सीताम्मावरी पडालु, शनिश्वर मंदिर व दक्षिणमुखी अंजनेय मंदिरासह आणखी दोन मंदिरे पाडली गेली.या पाडकामावरून श्रद्धाळु नागरिकांमध्ये संताप उसळला व ते रस्त्यावर आले. भाजपा व तेलगु देसमने यास आपापले राजकीय रंग दिल्याने परिस्थिती आणखी चिघळली. ‘कृष्ण पुष्करम’च्या आयोजनात कोणतीही हिंदू धर्मार्थ संस्था सहभागी होणार नाही, असे हिंदु धर्म परिरक्षण समितीने जाहीर केले.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने पाच मंत्र्यांची एक समिती नेमली. पाडलेली ही सर्व मंदिरे त्याच ठिकाणी पण वाहतुकीस अडथळा येणार नाही अशी अधिक चांगल्या प्रकारे पुन्हा बांधून दिली जातील, असे धर्मादाय व्यवहारमंत्री पी. मणिकल्या राव यांनी समितीचया वतीने जाहीर केले. ही कारवाई करण्याआधी लोकांना पूर्वसूचना देऊन विशवासता घ्यायला हवे होते, असे म्हणून मंत्री समितीने अधिकाऱ्यांच्या डोक्यावर खापर फोडले.